पुनश्च सिंहासन

         

ऐंशीच्या दशकातील एक उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून, ज्येष्ठ सिने निर्माते जब्बार पटेल यांनी दिग्ददर्शित केलेला सिंहासन ओळखला जातो. अनैतिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा राजकरण्यासी असणारा सबंध तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांपासून कैक दुर अस्या मुद्यांवर राजकारण कसे खेळले जाते? ते त्यात सांगण्यात आले आहे.  मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कांदबरीच्या संयोगातून तयार झालेल्या आणि अनेक  मातब्बर सिने कलावंत असणाऱ्या या चित्रपटाचा दुसरा अंक सध्या सुरु झाला आहे का ? असे वाटावे असे वातावरण सध्या महाराष्ट्रात सुरु आहे.
चित्रपटात स्मगर्लस चा राजकारण्यासी असणारा सबंध दाखवण्यात आला आहे. तर सध्या अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींचा राजकरण्यासी असणारा सबंधावरून राजकारण तापत आहे. चित्रपटात सामन्य जनतेच्या प्रश्नाला बगल देत सरकार पाडण्याचा विरोधकांचा, आणि त्यांची बाजू त्यांच्यावरच उलटवण्याचा मुख्यमंत्र्यांचा यशस्वी प्रयोग दाखवण्यात आला आहे. आता देखील जनतेच्या प्रश्नांवरुन सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी सरकारमधील मंत्र्यांचा वर्तनावरुन सरकारला पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरु असल्याचे आपणास दिसते. सर्वसामान्यांचा प्रश्नांंबाबाबत कसी टोलवाटोलवी केली जाते? हे त्या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात आपणास दिसते. तिथे दुष्काळामुळे झालेल्या मृत्यूबाबत विरोधकांनी
उपस्थित केलेल्या प्रश्नाला सदर व्यक्तीचे निधन हे वयोमानामुळे झाले असे उत्तर देण्यात येते, आज देखील काहीसे असेच उत्तर देण्यात येते.कोणत्याही युद्धात बळी हा निम्मस्तरावरील व्यक्तीचा जातो, वरचे सुरक्षीत राहतात. हे स्मग्लर्सचा साठा किनाऱ्यावर उतरत असताना ते उतरवणाऱ्या व्यक्तींमध्ये झालेल्या झपाटीमध्ये दिसते.उच्चपदस्थ आपल्याला अडचणीचा ठरणाऱ्या निम्मस्तराच्या कस्या पद्धतीने काटा काढतात, हेसुद्धा या झटापटतीत दिसते. सध्याचा हप्ता  गोळा करण्यावरुन रंगलेल्या नाट्याबाबतही हेच म्हणता येईल. पोलीसांच्या पदांच्या श्रेणीत पोलीस उप निरीक्षक हे पद बऱ्याच निम्म श्रेणीतील आहे. मात्र या पदावरील व्यक्तीचाच बळी गेल्याचे दिसत आहे. त्यावरील वरीष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त यांच्या मुकसंमतीशिवाय कोणीही पोलीस लाच घेवू शकत नाही. मात्र आपण त्यांच्यापैकी कोणाचेच नाव या प्रकरणात समोर आलेले नाही.सिंहासन या चित्रपटात राजकारणी व्यक्तींचे जवळचे नातेवाईक त्यांचा पदाचा गैरवापर करत आपली कृष्णकृत्ये करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.आजदेखील हेच चित्र आपणाला दिसते. सिंहासनमध्ये विरोधकांना हाताशी धरुन स्वतःचेच सरकार अल्पमतात आणण्याचे, आणि नव्या संभाव्य सरकारमध्ये अधिक उत्तम पद मिळवण्याचे प्रयत्न करताना दाखवले आहे. सध्याचा राजकारणाकडे बघीतल्यास सुद्धा हेच कमी अधिक प्रमाणात सुरु असल्याचे दिसते.
म्हणून म्हणावेसे वाटते सिंहासन या चित्रपटाचा दुसरा अंक तर सुरु झाला नाही?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?