महान समाजसुधारक स्वातंत्र्यवीर सावरकर


जानेवारी १९२४ ही फक्त एक दिनांक नाहीये क्रांतिकारकाबरोबर समाजसुधारणेचे कार्य करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमानातून सुटका होऊन रत्नागिरीत स्थानबद्धतेत रवानगी होण्याच्या हा दिवस आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वातील एक दुर्लक्षित पैलू असणाऱ्या समाजसुधारक हा पैलू क्रांतिकारक या पैलूसारखाच समाजात तेजानेफडकण्याच्या हा दिवस यावर्षी या घटनेला १०० वर्ष पूर्ण होत आहे

      आपल्या भारतीय स्वतंत्रलढ्याकडे नजर टाकल्यास लोकमान्य टिळकांसारखे स्वातंत्र्यासाठी पेटलेले नेते दिसतात मात्र समज सुधांरणेबाबत लोकमान्य टिळकांची मते काहीशी प्रतिकूल होती सर्वप्रथम हे परकीय राज्य इथून निघून गेले पाहिजे  परकीय राज्य जाऊन स्वकीयांचे राज्य आल्यावर सामाजिक सुधारणा सहजतेने करता येईल आपले ध्येय परकीय सत्ता उलथून टाकणे हेच असले पाहिजे हे असे लोकमान्य टिळकांना वाटत असे . तर ज्येष्ठसमाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर याच्या मते भारतीय समजणे ब्रिटिशांच्या राजवटीचा फायदा घेत सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय मिळणाऱ्या राजकीय स्वातंत्र्यास काहीही अर्थ नाही मात्र स्वातंत्रवीर सावरकर हे राजकीय स्वातंत्र्याबरोबरसामाजिक सुधारणांच्या आग्रह धरणारे व्यक्तिमत्व होते आपल्या भारतीय स्वतंत्रलढ्यातील नेत्याच्या विचार करता या गोष्टीमुळेच स्वातंत्रवीर सावरकर उजवे ठरतात चार करता या गोष्टीमुळेच स्वातंत्रवीर सावरकर उजवे ठरतात

अंदमानातील सेल्युलर जेलमधून सुटका झाल्यावर पुढची सुमारे १२ ते १३  वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत  अलीपूरच्या तुरुंगात आणि रत्नागिरी येथील घरात  स्थानबद्ध होते.या काळात त्यांनी समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले. या काळात हिंदू धर्मातील अनेक दोषांवर अत्यंत प्रखर शब्दात कोरडे ओढणारे लेखन केलॆ . त्यांचे समाज सुधारणेबाबतचे  लेखन "क्ष किरणेया निबंधाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहेत . त्याची काही मते आज २०२४साली देखील पचवणे अत्यंत कठीण आहे त्यांनी अस्पृश्यता निवारणरोटी बंदी  बेटी बंदी , व्यवसायबंदी , शुद्धीबंदी आदी ,समुद्रीबंदी  हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांच्या फोलपणा लोकांच्या लक्षात यावा आणि लोकांनी त्या सोडून दयाव्यात यासाठी प्रयत्नची पराकाष्ठा केली आपले समज सुधारणेचे


कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी  जातुच्छेदक निबंध, विज्ञाननिष्ठां निबंध अशी पुस्तकेही लिहली त्याकाळी हिंदू धर्मियांची सर्व प्रार्थनास्थळे सर्व हिंदूंसाठी उघडी नसत  काही हिंदू समाजबांधव मंदिरात जाऊ शकत नसे त्याच्या विरोध करण्यासाठी त्यांनी रत्नागिरीत सर्व लोक जाऊ शकतील असे मंदिर उभारले रत्नागिरीचे सुप्रसिद्ध पतितपावन मंदिर ते हेच   सावरकरांनी आपल्या प्राचीन वारसा लाभलेल्या हिंदू धर्मातील कालसुसंगत नसणाऱ्या  चालीरीतींना  तिलांजली देत त्यास खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनवलेप्रखर धर्मप्रेमी असूनही धर्मातील अनिष्ट चालीरीतीवर हल्ला चालवणारे समाजाने आता विज्ञानाची कास धरली पाहिजे हे सागणारे सावरकर खरोखर महान व्यक्तीमत्व होते गाय उपयुक्त पशू आहे मानवाने तिचा जास्तीत जास्त वापर केला पाहीजे किंवा माझा निधनानंतर माझे कोणतेही क्रियाक्रम करू नये असे म्रुत्यूपञात सांगणारे सावरकर मला त्यामुळे अधिकच वंदनीय ठरतात सावरकर म्हणजे हिंदूत्व असा संकुचित अर्थ घेणाऱ्यांनी  सावकरांचा या विचाराचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे  अंदमानातील जीवन ,तेथून सुटका आणि 1947नंतरच्या त्यांचा जीवनाविषयी अनेकदा बोलले जाते.मात्र या सर्व प्रकारात त्यांचा एक पैलू दुर्दैवाने अप्रकाशीतच राहतो, तो म्हणजे आपल्या रत्नागिरीच्या मुक्कामात त्यांनी केलेले समाजप्रबोधनाचे कार्य आपल्या दुर्दैवाने अनेक स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी सुद्धा याबाबत फारसेबोलत नाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा  हिंदुत्वाचा मुद्यावरून अनेक समाजवादी विचारवंत त्यांच्या द्वेष

करतात मात्र समाजवाद्यांच्या विचाराच्या जवळ जाणाऱ्या या हिंदू धर्माच्या सुधारणेबाबत मात्र जाणून घेत नाहीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराचे समर्थक त्यांच्या हिंदुत्व या विचारसरणीबाबाबत मोठ्या प्रमाणात बोलतात त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा मुदा मात्र अप्रकाशित राहतो जे दूर करण्याची नामी संधी आपणास या ६ जानेवारीस मिळत आहे मग उचलणार ना या संधीचा फायदा 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?