जगाचे वर्तमान मोठ्या प्रमाणात बदलवणाऱ्या घटनेचा सविस्तर वृत्तान्त "शोध दहशतवादाचा "

सप्टेंबर 11सन 2001 ही फक्त अन्य तारखेसारखी तारीख नाही.वर्तमानात आपण ज्या समस्या अनुभवतोय.त्यातील अनेक घटनांचा मार्ग बदलण्याची घटना या तारखेस झाली. न्युर्याक येथील ट्वीन टॉवरवर दहशतवाद्यांचा हल्ला होण्याची घटना म्हणून आता या प्रसंगाला आपण ओळखतो‌.या प्रसंगावर आतापर्यंत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लिहून झाले आहे. मात्र ते सारे इंग्रजीत लिहलेले आढळते.काही प्रमाणात अन्य भारतीय भाषेत या बाबत अभ्यासपूर्ण लेखन केलेले आढळते. मात्र या लेखनाच्या मुळाशी गेल्यास मुळातील इंग्रजी लेखनाचा तो अनुवादच असल्याचे आपणास दिसते‌. या घटनेविषयी प्रसिद्ध झालेल्या अमेरिकेच्या वृत्तपत्रातील बातम्या,अमेरीकन प्रशासनाचा याबाबतचा अहवाल यांचा अभ्यास करत थेट इंग्रजी सोडून अन्य भारतीय भाषेत अभ्यासपूर्ण लेखन केलेले आपणास सहजतेने दिसून येत नाही. आपल्या मराठीमध्ये मात्र ही उणीव भरून निघाली.आणि याला निमित्त ठरले आहे अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेले "शोध दहशतवादाचा" हे पुस्तक .शोध दहशतवादाचा या पुस्तकाचे लेखन केले आहे, ज्येष्ठ पत्रकार के. पुरुषोत्तम महाले यांनी .
    महाराष्ट्र टाइम्समध्ये वृत्तसंपादक या संपादकीय विभागांतील महत्तवाच्या पदांवर अनेक वर्ष कार्य करणाऱ्या पुरषोत्तम महाले यांना आपण पत्रकार म्हणूनच नव्हे तर अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे मार्गदर्शक म्हणून देखील आपण ओळखतो. अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत संस्थांनी आजवर त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे. त्यांनी याच मार्गदर्शनाच्या हेतूने सदर पुस्तकाचे टिपण तयार केले होते.जे त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पुतण्याच्या पाठपुराव्यामुळे पुस्तक स्वरुपात प्रकाशित झाले ते म्हणजे हे पुस्तक.जे मी नाशिकमधील महत्त्वाची सांस्कृतिक संस्था सावाना (सार्वजनिक वाचनालय नाशिक)घ्या सहकार्याने नूकतेच वाचले.
    सुमारे 200पानाचे हे पुस्तक 13विविध प्रकरणातून आपणास 9/11याची सविस्तर माहिती आपणास  देते यासाठी लेखकाने आपल्या अमेरिका दौऱ्यात विविध वर्तमानपत्राच्या बातम्या, प्रकाशित लेख आणि आणि काही मान्यवरांच्या भेटी घेवून त्यांच्याकडुन मिळालेली माहिती यांचा वापर करत लेखन केले आहे. अन्य इंग्रजी पुस्तकाचा वापर करुन पुस्तक लिहण्यापेक्षा मुळातील संदर्भाचा वापर करत पुस्तक लिहले असल्याने अधिक माहितीपुर्ण झाले आहे.तसेच संदर्भाचा अन्य लेखकाने चुकीचा अर्थ लावून त्याचे पुस्तक लिहले असल्यास संदर्भात होणारी गल्लत देखील या पुस्तकामुळे टळली आहे.13 प्रकरणातील पहिले तीन प्रकरणे घटना कशी घडली,?या हल्ल्यामागे ओसामा बिन लादेनचा हात असल्याचा संशय अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना कस्या प्रकारे आला?त्यांचा सुरवातीच्या तपास कसा झाला याविषयी माहिती देतात .शेवटचे प्रकरण सायबर दहशतवाद याविषयी आपणास माहिती देते तर शेवटून दुसरे प्रकरण आपल्या भारतीय तपास यंत्रणांनी या तपास मोहिमेद्वारे काय अर्थबोध घ्यावा या विषयावर आहे.या खेरीज अन्य प्रकरणे या हल्ल्यामागे मानसिकता आणि हा तपास कसा वेग पकडत गेला याविषयी आपणास माहिती देतात.
     9/11ही घटना घडुन अनेक वर्ष उलटून गेली आहेत.आता या घटनेविषयी कश्याला वाचायचे?असा विचार तूमच्या मनात येत असेल तर ते चूकीचे आहे.आज 2024साली आपल्याला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांचे मुळ आपणास या घटनेत सापडते.अमेरीका पाकिस्तान संबंध आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम, अमेरिकेची मोठ्या प्रमाणात सुधारलेली सुरक्षा यंत्रणा,अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेवरून अमेरिकेत खेळले गेलेले अंतर्गत राजकारण,या राजकारणाचा जगावर झालेला परिणाम,इस्लामी जगताचा मोठ्या प्रमाणात सुरु झालेला अभ्यास , अन्य दहशतवादी गटांवर या दहशतवादी घटनेचा पडलेला प्रभाव, अफगाणिस्तान देशातील समाजकारण पुर्णतः ढवळुन निघणे या सारख्या अनेक घडामोडींचा मुळातून अभ्यास करायचा झाल्यास आपणास 9/11या घटनेचा अभ्यास आवश्यक आहे,आणि या अभ्यासासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे,मग वाचणार ना हे पुस्तक.!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?