पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'
जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुमारे ६० टक्के नैसर्गिक इंधनाची वाहतूक ज्या प्रदेशातून होते ते इराणचे अखात ते हेच.या इराणच्याआ आखातापासून जगातील अत्यंत स्फोटक प्रदेशाला सुरवात होते जी त्यानंतर समुद्र पुन्हा आत जातो ,त्या ठिकाणाला अर्थात लाल समुद्राला वळसा घालत आफ्रिका खंडाच्या उत्तर दिशेकडील काही देश घेवून स्थिरावते .अरब महाद्विप, पश्चिम आशिया किंवा युरोपीय वसाहातवादी देशांच्या चष्म्यातून बघीतल्यास मध्यपुर्व (middel east)या विविध नावाने ओळखला प्रदेश तो हाच.नैसर्गिक उर्जासाधनांनी अत्यंत श्रीमंत किंबहुना याच श्रीमंतीच्या जोरावर अनेकदा जगाला भंडावून सोडणाऱ्या या प्रदेशाविषयी आपल्या मराठीत काहीसे कमी लिहले गेलेले आढळते. जे काही मराठीत लेखन उपलब्ध आहे,त्यामध्ये तेथील पर्यटन स्थळांची माहिती,या प्रदेशात बांधकांम मजूर म्हणून नोकरी करणाऱ्या भारतीयांचे अनुभव विश्व याचाच जास्त भरणा आपणास दिसतो . मात्र देशांतर्गत राजकारण, तेथील समाजजीवन २०व्या शतकाच्या सुरवातीला त्या भागात नैसर्गिक इंधनाचे साठे सापडल्यावर अचानक श्रीमंती आल्यामुळे बदललेले आर्थिक जीवन ,या नैसर्गिक इंधनाचे नियंत्रण आपल्याकडे असावे,यासाठी युरोप खंडाच्या पश्चिमेकडील देशांनी आणि अमेरिकेने खेळलेल आंतरराष्ट्रीय राजकारण.या आंतराष्ट्रीय राजकारणाला उत्तर म्हणून या प्रदेशात उभ्या राहिलेल्या विविध संघटना आणि त्यांची वाटचाल याविषयी आपणाकडे फारच कमी बोलले जाते, मात्र ही कमतरता बऱ्याच अंशी कमी होते ते याबाबत आपल्या देशांतर्गत राजकीय भूमिकेमुळे अनेकांचे नावडते संपादक झालेले गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या पुस्तकामुळे. गिरीश कुबेर यांनी पश्चिम आशियाशी संबंधित ,एका तेलियाने, हा तेल नावाचा इतिहास आहे, तेल नावाचं वर्तमान, अधर्म युद्ध असी विविध पुस्तके लिहली आहेत.त्यातील अधर्म युद्ध हे पुस्तक मी नुकतेच वाचले.
मी आधीच सांगितल्याप्रमाणे या पुस्तकाचे लेखन करणारे गिरीश कुबेर त्यांच्या देशांतर्गत राजकारणाविषयी
घेतलेल्या भुमिकेमुळे अनेकांचे नावडते आहेत.मात्र ते लक्षात ठेवत हे पुस्तक वाचायचेच नाही असे ठरवल्यास आपण एका महत्त्वाचा ज्ञानाला मुकु हे नक्की. या उलट समर्थ रामदास स्वामी यांचा ',उत्तमाची ते घ्यावे, मिळमिळत ते टाकूनी द्यावे,असा संदेश आचरणात आणत ,गिरीश कुबेर यांची देशांतर्गत राजकरणाविषयीची मते मिळमिळीत म्हणून टाकून दिल्यास आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील ज्ञान उत्तम समजून त्या विषयीचे हे पुस्तक वाचल्यास आपणास एक फार मोठा खजिना सापडेल याबाबत खात्री बाळगा.मग वाचणार ना हे पुस्तक.
अजिंक्य तरटे
९५५२५९९४९५
९४२३५१५४००
इमेल पत्ता
ajinkya.tarte2 @gmail.com
टिप्पण्या