पोस्ट्स

एका महत्त्वाच्या मात्र दुर्लक्षित गोष्टींकडे लक्ष वेधून घेणारे पुस्तक, "ऑटीझम

इमेज
पुर्वीच्या तूलनेत सध्याचा काळात आपल्या भारतात अनेक विकारांबाबत मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन करण्यात येत असले, तरी काही विकार अजुन देखील समाज प्रबोधनाच्या बाबतीत बरेच मागे आहेत.या विकारांनी ग्रस्त लोकांची संख्या लाखोत असली तरी त्याबाबत फारसे बोलले जात नाही.समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे माध्यम असलेल्या चित्रपटातच नव्हे, तर वैद्यकीय स्तरावर सुद्धा त्याबाबत व्यापक चर्चा होत नाही.परीणामी या धोक्याची जाणीवच जन सामन्यांना होत नाही, ऑटीझम हा असाच फारसा चर्चिला न जाणारा विकार . सुमारे २टक्के (अचूकपणे सांगायचे झाल्यास दर ५४पैकी १) इतक्या लोकांना होणारा एक गंभीर स्वरुपाचा विकार.ज्या अभागी जणांना हा विकार होतो त्या व्यक्तींचेच नव्हे तर त्यांचे कुटुंबियांचे भावविश्व पुर्णतः नष्ट करणारा हा विकार. आपल्या मराठीचा विचार करता या विषयी जवळपास काहीच लिहलेले आढळत नाही..त्यातही जे काही आढळते,त्यात शास्त्रीय माहितीचा अभावच दिसतो..मात्र ही पोकळी भरुन येते, ती मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी झटणाऱ्या अच्यूत गोडबोले यांच्या "ऑटीझम या पुस्तकामुळे. स्वतःच्या मुलाला ऑटीझम झाल्यामुळे त्यातील दाहकता जवळुन अ...

सकारात्मक पत्रकारितेचे उत्कृष्ट उदाहरण, "पोलादी माणसं, नाशिक जिल्हा भाग १"

इमेज
               सध्याचा काळात सातत्याने पत्रकारिता  नकारात्मकतेचा प्रचार प्रसार करते,आरोप करण्यात येतो. आजच्या माध्यमातील बातम्या बघितल्यस त्यात सातत्याने खुन,दरोडा , गुन्हेगारी, बलात्कार,आदी विषयक बातम्या दिसत असल्याने हा आरोप खरा आहे,असे पटायला लागते.मात्र सर्वच माध्यमे तसीच आहेत, असे सर्वसाम्यनीकरण करणे अयोग्य आहे. जरी संख्येने कमी असले तरी काही पत्रकार सकारात्मक पत्रकारीता करत समाजात आपले एक चांगले स्थान निर्माण करत आहेत.ज्येष्ठ पत्रकार दत्ता जोशी हे अस्या मोजक्या पत्रकारांपैकीच एक. समाजात आदर्श घ्यावा अस्या उद्योगपतींचे कार्य ते जिल्हावार पुस्तक रुपाने प्रसिद्ध करत आहेत.त्यांची  सोलापूर, हिंगोली,बीड, अकोला वाशीम,अहमदनगर अस्या वीस जिल्ह्यातील आदर्श उद्योजकांची ओळख करुन देणारी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.याच मालिकेतील नाशिक जिल्ह्यातील आदर्श उद्योजकांची ओळख करुन देणाऱ्या २भागांच्या  पुस्तकांपैकी पहिल्या भागाचे पुस्तक मी नुकतेच सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्यामार्फत  वाचले.             ...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग४

इमेज
मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात . आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा ( नागपूर प्रशासकीय विभाग ) अपवाद वगळता आपली एसटी जाते , अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे . या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले . तेदेखील मी वेळोवेळी पर्यटनाच्या निमित्ताने भाग एक आणि   भाग दोन यामध्ये सविस्तर सांगितले आहेच . ज्यांना ते वाचायचे असतील अस्या व्यक्तींना ते शोधणे सोईस्कर   व्हावे यासाठी त्यांचा लिंक मी खाली देईलच . या लेखात माझ्या फिरण्यात ज्या बाबी मला दिसून आल्या त्याविषयी मी बोलणार आहे .     तर मित्रांनो , मी माझ्या फिरण्याची तयारी करताना संबधित जिह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर जावून संबंधित जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेत माझ्या फिरण्याचे नियोजन करतो . या दरम्यान मला आढळलेली गोष्ट म्हणजे , पालघर जिल्ह्याचा अपवाद वगळता अन्य सर्व जिल्ह्याचा वेबसाइट नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरकडून...

प्रत्येक पत्रकारांच्या संग्रही असावे असे पुस्तक.., "नाशिक जिल्ह्यातील संसद सदस्य"

इमेज
     आपल्याकडे माध्यमांच्या अर्थकारणाच्या बाजू सांगताना, या चार क्षेत्राच्या बातम्यांना नेहमीच प्रेक्षकवर्ग मिळतो. सातत्याने प्रेक्षकवर्ग असल्याने,  जाहिरातीदार नेहमीच या क्षेत्राची बातमी देणाऱ्या माध्यमांकडे जाहिराती देतात.जाहिराती या माध्यमांचा अर्थकारणाचा महत्त्वाचा स्त्रोत असल्याने, माध्यमे या क्षैत्राची बातमी देण्यास प्राधान्य देतात,असे सांगितले जाते.त्यातील एक म्हणजे राजकारण (अन्य तीन म्हणजे क्रिकेट, सिनेमा, क्राइम {याला यांच्या  सुरवातीच्या अक्षरावरून "थ्री सी वन पी" असे म्हणतात}).तर या राजकारणाचा ठळक आविष्कार म्हणजे खासदार .त्यामुळे कोणत्याही पत्रकारास पत्रकारीता करायची झाल्यास आपल्या क्षेत्रातील विद्यमान खासदार आणि माजी खासदारांची किमान माहिती असणे आवश्यक ठरते.याची माहिती सहजतेने मिळत नसल्याने, कोणत्याही पत्रकारास  सुरवातीच्या काळात अनेक कष्ट घ्यावे लागतात. मात्र नाशिक परिसरातील पत्रकारांची यातुन मोठ्या प्रमाणात सुटका झाली आहे.याला कारण ठरले आहे, डांग सेवा मंडळाच्या अभोणा येथील महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या डॉ .प्रा...

मराठीला खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा करणारे पुस्तक इंडस्ट्री 4.0

इमेज
आताच काळात आपले सर्व जीवन   तंत्रज्ञानाशिवाय चालणे अशक्यच आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही उठल्यापासून झोपेपर्यंत आपले सर्व जीवन हे तंत्रज्ञानाने व्यापून राहिलेले आहे . ऑफिसमधील काम असो किंवा ऑफिस सुटल्यावर आपण घरी येण्यासाठी वापरत असलेली साधने असो हि सर्व तंत्रज्ञानाचीच किमया असो जास्त दूर कश्याला जायचे आता तुम्ही हा जो मजकूर वाचत आहात ती पण तंत्रज्ञानाचीच किमया . जगात कोणतीही   गोष्ट कायमस्वरूपी नसते असे म्हणतात मात्र या गोष्टीला एक अपवाद आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाचा विकास हो तंत्रज्ञाचा विकास पूर्वीपण होत होता आताही होत आहे आणि भविष्यलत देखील होता असेल भले त्याची गती कमी जास्त असेल मात्र तंत्रज्ञाचा विकास याला मरण नाही त्या अर्थाने तो अमर आहे              आता अश्या तंत्रज्ञाचा वापर करताना या गोष्टी कश्या प्रकारे कार्यान्वित होतात ? हे कळलेच पाहिजे हि अट हे तंत्रज्ञान वापरताना नसली तरी आपण जी ...