नाशिकमधील काही धाडसी आणि समाजभान जपणाऱ्या महिला पत्रकारांनी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘शौर्य रणरागिणी न्यूज’ या स्थानिक वृत्तवाहिनीने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि सामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या या माध्यम संस्थेचा प्रथम वर्धापन दिन नुकताच नाशिकमध्ये अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. त्याचबरोबर ‘शौर्य पद्मराज रत्न पुरस्कार’ आणि पत्रकार सन्मान सोहळ्याने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली. सातपूर येथील मोतीवाला कॉलेजच्या भव्य ऑडिटोरियममध्ये आयोजित या सोहळ्याला राज्यभरातून विविध क्षेत्रांतील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून समाजभूषण नानजीभाई खेमजीभाई ठक्कर, पश्चिम नाशिकच्या आमदार सीमाताई महेश हिरे, नगरसेविका मयुरीताई अंकुश पवार, ‘मिसेस इंडिया २०२४’ स्मिता अहिरे सामाजिक कार्यकर्ते संदीप शर्मा, कलाकार मयुरी सोनी तसेच ‘दैनिक समर्थ गांवकरी’चे संपादक विश्वासराव आरोटे उपस्थ...
टिप्पण्या