पोस्ट्स

हे बदल आपल्या एसटीत कधी होणार?

इमेज
    आपली महाराष्ट्राची एसटी आधीच विविध सोइसवलतीने डबघाईस आलेली असताना, एकनाथ शिंदे यांच्या नेर्तुत्वाखालील मंत्रीमंडळाने तीला 75 वर्षावरील व्यक्तींना पुर्णतः मोफत प्रवास करण्याचा घोषणेने आणखी एका सोईसवलतीचा भार देवून टाकला. एकीकडे आपल्या एसटीचे सवलतीचे ओझे वाढत असताना, आपल्या शेजारील गुजरात राज्यातील एसटीने एक मैलाचा दगड गाठला गेला.  देशभरातील एल .एन. जी.वर चालणारी पहिली एसटी बस चालवण्याचा मान, गुजरात राज्य परीवहन महामंडळाला मिळाला आहे.      गुजरात एसटीच्या विश्वामित्र या विभागातर्फे (बडोदा जिल्हा विभाग) नुकतेच याच्याशी संबधीत बसची प्रादेशिक वाहतूक विभागाकडे नोंदणी करण्यात आली. मुळच्या डिझेल बसमध्ये बदल करत, तीला एल. .एन.जी. इंधनावर चालवण्यासाठी सक्षम करण्यात आले आहे. एल. एन.जी या इंधनामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.          एकेकाळी देशात नवनवीन उपक्रम राबवण्याबाबत महाराष्ट्र एसटी अनभिषक्त सम्राट होती. देशात पहिली गोष्ट करायची ती महाराष्ट्र एसटीनेच .महाराष्ट्र एसटीची काँपी नंतर राज्यातील एसटीने करायची, हा सर्वमान्य नि...

एसटीला झाल तरी काय ?

इमेज
           एसटीला झालं तरी काय    ?  असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या बातम्या सध्या महाराष्ट्र एसटीबाबत  ऐकायला येत आहेत . ऐतिहासिक अश्या संपानंतर एसटी बसेस सुरु झाल्या खऱ्या . .मात्र त्यानंतर सुरु झालेल्या एसटीला सुरक्षित प्रवास म्हणजे एसटीचा प्रवास या वाक्याचा विसर पडलेला दिसत आहे ऐतिहासिक संपानंतर सुरु झालेल्या बसेसला अपघात होण्याचे किंवा बस नादुरुस्त होऊन रस्त्यातच बंद पडण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणत वाढल्या आहेत . बसेसचे वायपर योग्य प्रकारे कार्यरत असणे म्हणजे काहीतरी गंभीर गुन्हा आहे सबब बसेसचे वायपर कमीत कमी  कार्य कसे करतील यासाठी काम करणे आवश्यक आहे ,असा समज एसटीतील अधिकाऱयांचा तर झालेला नाहीना ? असे बसमध्ये फिरताना सध्या अनुभवायास येत आहे बस प्रवाश्यांना घेऊन एका गावाहून दुसऱ्या गावात जात असताना सस्पेंशनमध्ये बिघाड होणे,टायर पंचर झाल्यावर बदली टायर नसणे . परिणामी प्रवाश्याना रस्त्यात उतरवून दुसऱ्या बसमध्ये बसवून पुढच्या प्रवासाला पाठवणे हे प्रकार आता एखादा नियम असावाजो न पा...

भारतीय बुद्धिबळपटूंची लक्षणीय कामगिरी

इमेज
              सध्या भारतीय क्रीडाविश्व त्यातही बुद्धीबळविश्व अत्यंत दैदिप्तमान कामगिरी करत आहे . बुद्धिबळ   ऑलम्पियाडचे   अत्यंत दिमाखदार आणि यशस्वी   आयोजन करण्याचे शिवधनुष्य भारतीय क्रीडा खाते आणि तामिळनाडू सरकारने लीलया पेलल्यानंतर   भारतीय बुद्धिबळ विश्वाचा घोडा अधिकच मोठ्या वेगाने धावायला लागला आहे . ७ ऑगस्ट रोजी भारताला ७५ वा   ग्रँडमास्टर मिळाल्याचा आनंद   बुद्धिबळप्रेमींना आनंद मिळाला असताना तो आंनद द्विगुणित करणारी घडामोड भारताचे पहिले ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्या बाबत घडली . बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमन करणारी संघटना    इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ दि इचेस म्हणजेच फिडे या संघटनेच्या उपमुख्य अध्यक्ष (deputy president)  म्हणून   विश्वनाथन आंनद यांची निवड झाल्याची हि दुसरी आंनदवार्ता होती कोणत्याही बुद्धिबपटूस असा मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे    पाचवेळा विश्वविजेता झालेले   विश्व...

मना सज्जना

इमेज
       १८ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली . आईने मोबईल खेळायला न दिल्याने एका १२ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची ती घटना होती . उद्याचे भविष्य ज्या व्यक्तींच्या हाती आहे तिची मनोवस्था कोणत्या  परिस्थितीत  आहे याचा हा ठसठशीत पुरावाच म्हणता येईल .  हे फक्त एका प्रातिनिधिक उदाहरण आहे जर आपण रोज वर्तमानपत्राचे वाचन केले तर आपणस अश्या अनेक घटना वाचावयास मिळतील .  एक गंभीर समस्या असून देखील आपणाकडे याकडे दुर्दैवाने फारशे काही बॊलले जात नाही . अशी एखादी घटना ऐकल्याने  आई वडिलांनी अति लाड केल्याने त्या मूलने मुलीने असे पाऊल उचलले असे म्हणून सोडून देण्यासारख्या या घटना नाही अति लाडाने १०० मुलामुलींपैकी एखादा असे टोकाचे पाऊल उचलेल मात्र जेव्हा अश्या घटनांची संख्या प्रचंड वाढते तेव्हा ती समस्या फक्त काही लोकांची वैयक्तिक समस्या राहत नाही तर सामाजिक समस्या होते  लहान मुळा मुलींची आत्महत्या  हि सुद्धा अशीच सामाजिक समस्या आहे     पूर्वी कधीही होत  नव्हत्या इतक्या मोठ्या प्रमाणात आता सुजाण पालकत्वाब...

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आम्हाला माफ करा

इमेज
तिर्थस्वरुप डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना साष्टांग नमस्कार      डॉक्टर आम्हाला माफ करा . येत्या 20   आॉगस्टला तुमच्या जाण्याला तब्बल 9 वर्षे होतील . माञ न्यायालयात खटला उभा राहणे तर दुरच आम्ही तुमच्या मारेकऱ्यांना   पण पकडु शकलो नाही . नाहि म्हणायला आम्ही काही संशयीतांची चौकशी केली . तुमच्या तत्वात न बसणारा प्लँचेट आदी प्रकार करून तुमच्या मारेकऱ्याला   शोधण्याचा प्रयत्न केला . पण उपयोग शुन्य झाला . त्या बद्दल आम्हाला माफ करा   ? काही महिन्यांपूर्वी   कोल्हापुरच्या गोविंद पानसरे यांच्या हत्येची प्राथमिक चौकशीसरकारकडून पूर्ण झाल्याविषयी    बातमी वाचली .   तेव्हा मनात विचार आला तूमच्या बाबतीत ही बातमी कधी वाचायला मिळेल जेव्हा मिळेल तो सुदिन असेल खरच .. डॉक्टर तुमच्या   हत्येचे मारेकरी पकडले तरी त्याना शिक्षा होण्यासाठी किती कालावधी लागेल . महात्मा फुल्यांचा निर्मीकासच ठाउक असेल कदाचित ? तुमच्या हत्येचे मारेकरी म्हणून . का...