पोस्ट्स

फक्त 17कमी !

इमेज
फक्त 17 कमी!  शीर्षक वाचून चमकलात ना? कस्यासाठी 17कमी?, असा प्रश्न तूमच्या मनात निर्माण झाला असेल तर सांगतो , फक्त 17कमी ही बाब, भारताच्या बुद्धीबळ गँडमास्टरच्या संदर्भात आहे. भारताचे हा मजकुर लिहीत असताना 83ग्रँडमास्टर झाले आहेत. अजून १७ ग्रँडमास्टर झाल्यावर भारतात ग्रँडमास्टरांच्या संख्येचे शतक होईल. आपल्याकडे 100 या संख्येचे विशेष महत्त्व आहे. वयाची 100वर्ष पुर्ण करोत, किंवा एखाद्या खेळाडूने 100वा सामना खेळो त्याकडे विशेष बाब म्हणून बघण्यात येते आणि 83 या संख्येत 17 मिळवले की 100 ही संख्या तयार होते.म्हणून म्हटले अजून 17 बाकी आदित्य सामंत हे भारताचे 83वे ग्रँडमास्टर ठरले आहेत.   त्यांनी 28व्या अबू धाबी मास्टर्समध्ये पहिला GM नॉर्म आणि 3ऱ्या एल लोब्रेगॅट इव्हेंटमध्ये दुसरा नॉर्म मिळवला.बील मास्टर टूर्नामेंट ओपनमध्ये शानदार कामगिरीसह, ते भारताचा 83वा जीएम बनले 8 फेऱ्यांनंतर आदित्य यांचे सहा गुण झाले आहेत आणि ते सध्या बिएल मास्टर्सच्या पुढील फेरी खेळत आहेत. मात्र त्यामुळे परिणामावर काही फरक पडत नाही कारण त्यांनी ग्रँडमास्टर नॉर्मसाठी अगोदरच आवश्यक आवश्...

गायकी क्षेत्रातील टँजिडी क्वीन गिता दत्त

इमेज
        जूलै महिन्याची 20 तारीख उजाडली की सिने चाहत्यांना  आठवण होते ती , गिता दत्त यांची .अविट गाण्याची प्रतिभा लाभलेली असून देखील , प्रतिभावन तसेच अत्यंत हळव्या मनाचा आपल्या पतीचा आग्रहास्तव त्याने निर्माण केलेले , दिग्दशीत केलेले अथवा त्याने अभिनेता म्हणून काम केलेले चित्रपट वगळता अन्यत्र फारसी  न गायलेली गायिका गिता दत्त .पतीच्या विवाह्यबाह्य  प्रेमप्रकरणाला कडाडुन विरोध करणारी गायिका म्हणजे गिता दत्त .एका प्रसिद्ध सिने अभ्यासकाचा मते  गीता दत्ता या गायीका क्षेत्रातील मिनाकुमारी आहे ज्याप्रमाने अंगी प्रचंड गुणवत्ता असूनही दुर्देवाच्या फेऱ्यात अडकल्याने मिनाकुमारी अभियानाच्या क्षेत्रात जास्त पुढे जाउ शकल्या नाहीत तोच प्रकार काहीसा गीता घोष चौधरी यांच्या बाबत घडला.             गीता दत्त यांच जन्म सध्याचा बांगलादेशातील फत्तेपुर या गावी एका जमिनदार कूटूबात झाला. 1942 च्या सूमारास त्यांच्या कुटुबियांनी मुंबईत स्थलांतर केले .त्यांच्या  सिनेकारकर्दीची सूरवात 1946 च्या आसपास होते. फारसे गायकीचे शिक्षण न घेता अंगभू...

कथा महाराष्ट्राच्या टायटॅनिकची

इमेज
आपल्या सर्वांना लंडन या शहरांतून न्यूयॉर्क या शहरांत जाणाऱ्या आणि दुर्घटनाग्रस्त झालेल्या टायटॅनिक या जहाजाची गोष्ट माहिती असेलच या जहाजाच्या दुर्घटनेवर   तयार झालेला चित्रपट देखील आपण अनेकदा बघितला असेल .मात्र या टायटॅनिकच्या जहाज दुर्घटनेशी   साम्य असणारी दृघटना आपल्या महाराष्ट्रत देखील घडली होती मात्र दुदैवाने या घटनेला टायटॅनिक या दुर्घटनेच्या   तुलनेत खूपच कमी प्रसिद्धी मिळाली .   एस एस रामदास बोट दुर्घटना या नावाने ओळखली जाणारी या दुर्घटनेला   भारताच्या नौदल इतिहासात एक मोठा काळा डाग म्हणून ओळखले जाते किमान नारळी पौर्णिमा झाल्याशिवाय समुद्रात जाण्यास अटकाव करणारा सध्याच्या निर्बध याच दुर्घटनेनंतर लागू करण्यात आला   १७ जुलै १९४७ ,  आषाढ महिन्याच्या अमावास्येला मुबई पासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या दुर्घटनेत  ६०० लोकांना  प्राणास मुकावे लागले होते मृतांमध्ये बहुसंख्य कोकणात राहणारे  लोक होते काही ब्रिटीश लोक सुद्धा यात मृत्युमुखी पडेल मात्र त्यांची संख्या कमी होते बहुसंख्य भारतीयच होते . २०२३  साली या दुर्घटनेला  ७६ ...

चंद्रयान 3 भारतीयांची अभिनंदनस्पद कामगिरी

इमेज
  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने 14 जुलैला देशाच्या प्रगतीत एका अभिनंदनस्पद कामगिरीची नोंद केली, हे एव्हाना आपल्याला माहिती झालेच असेल . सुमारे तीन वर्ष अथक प्रयत्न करत जगातील 210 देशांपैकी अत्यंत मोजक्या एका हाताची पाच बोटे सुद्धा त्यांची यादी करायला जास्त होतील, अशी कामगिरी अर्थात चंद्रावर यान पोहोचवण्याची भीम कामगिरी भारताने पुन्हा एकदा पार पाडली .  ज्या देशाच्या अंतराळ संशोधन संस्थेची सुरवात,  दिवाळीत आपण उडवतो त्या प्रकारची, मात्र दिवाळीतील रॉकेटच्या पेक्षा मोठी रॉकेट उडवत, एका पडक्या चर्चमध्ये झाली.  रॉकेटचे विविध भाग शास्त्रज्ञानी सायकलवर एखादी मोळी बांधून वाहतूक करावी, त्या पद्धतीने वाहून आणले, या पद्धतीने झाली. त्या संस्थेने अमेरिका रशिया आदि विकसित देशच्या तुलनेत अत्यंत किरकोळ खर्च्यात चंद्राला गवसणी घालावी हे नवलच . ते देखील स्पेस वॉर सारख्या एखाद्या हॉलिवूडमधील चित्रपटाची निर्मितीसाठी लागलेल्या रककमेपेक्षा कमी खर्चात, चंद्रमोहिमेची आखणी करण्यात आली आहे, ही बाब आपण कायमच लक्षात घेयला हवी .        अन्य देशांच्या चंद्रमोहिमेत न आढलेले...

पेटते पश्चिम बंगाल

इमेज
  भारताच्या अध्यात्माची पाश्चात्य जगातला ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद , भारतात रसायनशास्त्रावर आधारित उद्योगाची पायाभरणी करणारे प्रफुल्लचंद्र रे , भारताला साहित्य क्षेत्रातील नोबेल देणारे रवींद्रनाथ टागोर . अर्थशास्त्रज्ञांचे नोबेल देणारे अमात्य सेन ,  ज्येष्ठ क्रांतिकारी सुभाषचंद्र बोस,  .आणि  बिपिनचंद्र पाल बाँलीवूडची जगाला उत्तम ओळख करुन देणारे सत्यजित रे . भारतात प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे राजा राममोहन रॉय .एकमेकांशी दुरान्वयेही संबंध नसणाऱ्या या सर्व व्यक्तींमधे एक सामान दुवा आहे . या  सर्व व्यक्ती बंगाली आहेत  बंगाल गंगेच्या त्रिभुज प्रदेशामुळे अत्यंत सुपीक झालेला प्रदेश त्यामध्ये तागासारख्या नगदी पिकांमुळे शेतीही समृद्ध म्हणावी अशी .त्या मध्ये सुरवातीला सांगितल्याप्रमाणे या सारख्या अत्यंत प्रतिभावान व्यक्तींमुळे  त्यात तर सोन्याहून पिवळे होण्यासारखी स्थिती.  भारतात सर्वाधिक पुस्तके बंगाली भाषेत वाचली जात असल्याचा इतिहास आहे. मात्र आजमितीस बंगालची स्थिती अत्यंत वाईट आहे . भारतातील सर्वात जास्त रस्त्यावरील भिकारी पश...

भारत कंबोडिया संबंध मैत्रीच्या नव्या वळणावर

इमेज
                 आपल्या भारतीय संस्कृतीचा फार मोठा प्रभाव जगभरात आहे भारताच्या सभोवतालचे देशच नव्हें तर त्या पासून दूर  असणाऱ्या देशांवर देखील फार  पूवीपासून भारताचा प्रभाव आहे  . कंबोडिया हा अशाच एक देश आशिया  खंडाच्या आग्नेय दिशेला असलेल्या  इंडो चायना  भागातील भारताचा प्रभाव असणारा देश . युके (इंग्लड )सारखी घटनादत्त राजेशाही असणाऱ्या या देशाचे राष्ट्रप्रमुख अर्थात  विद्यमान  कंबोडियाचे राजे  नोरोडोम सिहामोनी यांनी 29 मे  ते  31 मे या  कालावधीत भारताचा दौरा केला  भारत आणि कंबोडिया यांच्यातील राजनैतिक संबंधांस  70 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा दौरा आयोजित करण्यात आला होता  1952 मध्ये त्यांच्या  तत्कालीन राजाने  भारताला भेट दिल्यावर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते त्यास यंदा 70 वर्षे पूर्ण झाली आहेत1952 च्या त्या भेटीनंतर विद्यमान राजे नोरोडोम सिहामोनी  यांचे वडील  वडील नोरोडोम सिहानोक यांनी सन १९६३ साली . भेट दिली होती  ...

भारत नेपाळ संबंधाची नवी पहाट

इमेज
       नेपाळ , भारताच्या २८ पैकी उत्तराखंड ,उत्तरप्रदेश , बिहार ,पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पाच राज्यांबरोबर सीमा शेअर करणारा देश . उत्तराखंड या राज्यातील काही प्रदेशाबाबत काहीसा सिमववाद असणारा देश म्हणजे नेपाळ भारतीय संस्कृतीचा प्रचंड प्रभाव असलेलाभारत आणि चीन या दोन बलाढ्य देशातील बफर स्टेट म्हणजे नेपाळ तर या नेपाळचे पंतप्रधान   पुष्पकमल दहल 'प्रचंड' हे भारताचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 31 मे ते 3 जून  या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर   आले होते .  सध्याच्या कार्यकाळात पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान प्रचंड यांची ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट होती .परराष्ट्र व्यवहार मंत्री नारायण प्रकाश सौद, , अर्थमंत्री, डॉ. प्रकाश शरण महत, . ऊर्जा, जलसंपदा आणि पाटबंधारे मंत्री, शक्ती बहादूर बस्नेत,भौतिक पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्री,. प्रकाश ज्वाला, उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्री  रमेश रिजाल,  हे या भेटीदरम्यान पंतप्रधानांच्या सोबतच्या शिष्टमंडळाचा भाग होते   दोन्ही पंतप्रधानांनी पारंपारिक सौहार्द ...