पोस्ट्स

नमो प्रशासनाचे हे बदल आपणास माहिती आहे का ?

इमेज
नुकताच मी पुण्याहून नाशिकला प्रवास केला . प्रवासातील सहप्रवासी गपिष्ट होता , त्याच्याशी विविध विषयावर मनोसोक्त गप्पा रंगल्या . त्याच्यात मोदी सरकारची विविध क्षेत्रातील कामगिरी आणि त्यांनी अवलंबल्या सुधारणा हा विषय देखील होता . बोलण्याच्या ओघात त्या सह प्रवाश्याने नमो सरकारतर्फे प्रस्तावित असणाऱ्या मात्र माध्यमांद्वारे फारश्या चर्चेत नसणाऱ्या गोष्टींबाबबत देखील भाष्य केले . या माध्यमात न आलेल्या गोष्टी  प्रामुख्याने वनांशी संबंधित होत्या .            त्या प्रवाश्याने सांगितले की ,  नमो सरकारतर्फे लवकरच भारतीय वन कायद्यांअंतर्गत सुधारणा करण्यात येणार आहेत. ज्यामुळे वनात राहणाऱ्या लोकांच्या अनेक हक्कांवर गदा येणार आहे . भारतीय वनहक्क नीती २००६ आणि पेसा या कायद्यावण्ये देण्यात येणाऱ्या अनेक हक्कांना त्यामुळे वनवासींना मुकावे लागणार आहे . सरकार जरी भारतीय वन हक्क कायद्यांत बदल करत असले तरी , जरी या कायद्याची आधारशीला म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल त्या भारतीय वननिती  २०१४ बाबत सरकारची भूमिका अद्याप संदिग्ध आहे . ती वननिती अद्याप सरकारने जाह...

73 ची उमर गाठली

इमेज
                      कविवर्य कुसुमाग्रज यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनला 50 वर्षे पुर्ण झाली , त्यावेळेस "स्वातंत्र्य देवतेची विनवणी " ही फटका या काव्यप्रकारातील कविता लिहली होती . त्याला 2019 या वर्षी  २३ वर्षे पूर्ण झाली .साधारणतः २५  वर्षाची एक पिढी समजली जाते . त्यानुसार  जवळपास एका पिढीचा कालावधी  पूर्ण झाला आहे . त्या कवितेत त्यांनी त्यावेळच्या समस्यांचा उहापोह करत , स्वतंत्रदेवता या समस्यांकडे लक्ष द्या असे सांगत आहे अशी कल्पना करून भारताच्या तत्कालीन समस्या मांडल्या होत्या . आज एव्हढ्या वर्षांनंतरही आजची परिस्थिती बघत असताना असपणास स्पष्ट दिसते की , त्या समस्या अजूनही  जैसे थेच आहेत .किंबहुना त्यांनी अधिकच आवक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे ./                           त्यांनी त्यांच्या कवितेत जाती व्यवस्थेवर , मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर , महिलांच्या  समस्येवर, नोकरशहांच्या  कार्यप्रणालीवर , विविध  ठिकाणी होणा...

एक राष्ट्र एक निवडणूक निव्वळ अशक्यच

सध्या एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेवर विचारमंथन सुरु आहे . माझ्या मते ही संकल्पना राबवतांना येणाऱ्या खर्चाबाबत फक्त भाष्य केले जाते  जे या प्रश्नाची फक्त एकच बाजू दशर्वते . प्रत्येक प्रश्नाला दोन बाजू असतात ,    त्यातील दुसऱ्या बाजूचा लेखाजोखा मांडण्यासाठी लेखनप्रपंच आपल्या कडे ईव्हीएम यंत्रामार्फत निवडणूका घेतल्या जातात . सध्या भिन्नभिन्न वेळी निवडणूका घेत असल्याने एकच इव्हीएम यंत्र वारंवार वापरता येते . एकत्रच निवडणूका घेत असल्यास किती ईव्हीएम मशीन लागतील, आणि एकदा वापरल्यावर परत पाच वर्षांनीच त्याचे काम, येवढी यंत्रे सांभाळयाची ती कशी ? आणि आपल्याकडील एका ईव्हीएम मशीनमध्ये एका वेळी फक्त सोळा नावे अंतर्भुत करता येतात . देशातील पक्षांची आणि अपक्षांची यादी बघता यावर कात्री लावल्याशिवाय एका इव्हिएम वर सर्व नावे येणे अशक्यच, म्हणजे लोकशाहीच्या तत्वावरच घाला घालावा लागणार . म्हणजेच ही संकल्पना कितीही स्त्युत असली तरी राबवतांना अनेक अडचणी येणार . त्यावर तोडगा काढल्याशिवाय ही संकल्पना राबवणे धोक्याचे ठरेल यात शंका नाही

नारायणराव पेशवे सत्तापिपासू राजकारणाचा बळी

इमेज
आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध राजघराणी राज्य करुन गेली . त्यापैकी प्राचीनयुगात सातवाहन घराणे आणि मध्ययुगात यादव घराणे अणि भोसले घराणे आणि पेशवा घराणे ही प्रमुख घराणी आहेत .या घराण्याचा काळात समाजव्यवस्था कोणत्या प्रकारची होती . यावर या आधी प्रचंड प्रमाणात लिहले गेले आहे .या घराण्याचा विविध व्यक्तींवर लिहलेलेसुद्धा प्रचंड  साहित्य उपलब्ध आहे. या सर्व घराणे आणि व्यक्तीमत्वातील एका व्यक्तीमत्वाने मला प्रचंड भुरळ घातली आहे . ते व्यक्तीमत्व म्हणजे घराण्यातील सत्तापिपासू काकामुळे ज्याचा अधिकारपदाची वस्त्रे हाती घेतल्यावर तीन महिन्यात किंवा  वयाची 18वर्षे आणि 20 दिवस पुर्ण  झाल्यावर खुन करण्यात आला , ते पेशव्यांमधील सर्वात कमी राजपदावर असणारे व्यक्तीमत्व अर्थात नारायणराव पेशवे           10 आँगस्ट 1755 ते 30 आँगस्ट 1783 हा त्यांचा कालखंड . त्यांची आणि माझी जन्मतारीख ही सारखीच 10आँगस्ट  . त्यामुळे असेल कदाचित मला नारायणराव पेशवे यांच्या विषयी विलक्षण कुतूहल आहे . त्यांचे अकाली निधन  झाल्यामुळे त्यात वाढच झाली आहे . द्वापारयुगात महाभारतातस...

नितीवाल्या लोकांची अनिती .

इमेज
सध्या आपल्या महाराष्ट्रात एकच मुद्दा गाजतोय तो म्हणजे पाउस . मराठवाड्यात  काहीच पाऊस नसल्याने आणि सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडल्याने हाहाकार माजला आहे . एकाच राज्यातील ही दोन शहरे मात्र अत्यंत विरोधी हवामान दाखवत आहे  याला कारणीभूत आहे . सध्याचे अत्यंत जलद गतीने बदलणारे हवामान ,  आणि या  प्रकाशाच्या वेगाला लाजवेल अश्या  पद्धतीने बदलत्या हवामानाला कारणीभूत आहे . जगाला सर्वत्र नीतिमत्तेचे धडे देणारा मात्र स्वतः मात्र अत्यंत अनीतीने वागणारा देश अर्थात युनाटेड स्टेस्ट ऑफ अमेरिका .      . जगातील सर्वाधिक नैसर्गिक साधनसंपत्तीची नासधूस करून पर्यावरणाची हानी करणारा हा देश .इतरांनी त्यातही प्रामुख्याने आपल्या भारताने आणि चीनने नैसर्गिक साधन संपत्तीच्या अत्यंत काळजीपूर्वक वापर करावा असे सल्ला देणारा हा देश . स्वतःची आर्थिक प्रगती झाली आहे . ही प्रगती करताना आपण प्रचंड प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीची वाट लावली आहे . आता इतर देशांना प्रगतीची संधी देताना स्वतःच्या नैसर्गिक साधसनसंपत्तीच्या उधळपट्टीला लगाम न  घाल...

कर्तारपूर गुरुद्वारा,कलम 370 समस्येची अप्रकाशित बाजू

इमेज
सध्या भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द केलेल्या भारतीय संविधानातील कलम 370आणि कलम 35A ची जोरदार चर्चा सुरु आहे .  या  सर्व  चर्चांमध्ये  मुख्यतः जोर आहे तो काश्मीरमधील भविष्यकालीन विकास आणिरद्द करण्यात आलेल्या कलमाबाबत असणारी पाकिस्तानची भूमिका  . पाकिस्तानच्या विचार करता आपल्या भारतात फक्त व्यापारी संबंध  आणि क्रीडा संबंध लक्षात घेतले जातात. मात्र भारत आणि पाकिस्तान यांचा विचार करता या दोन  बाबींबरोबरच अजून एक गोष्ट लक्षात घेण्यास हवी मात्र ती काहीशी दुर्लक्षली जाते ती म्हणजे या दोन देशामध्ये संयुक्तरित्या सुरु असणारे विकास प्रकल्प .  या विकास प्रकल्पामध्ये कर्तारपूर या पाकिस्तानातील पंजाबमध्ये असणाऱ्या गावामध्ये उभारण्यात येणारा कर्तारपूर साहिब गुरुद्वारा आणि भारतीय हद्द या दरम्यान उभारण्यात येणार कर्तारपूर कौरीडॉर हा अत्यंत महत्वाचा आहे          शीख बांधवांचे पहिले गुरु , गुरु नानकदेवजी यांच्या आयुष्याची अखेरची वर्षे ज्या गुरुद्वारात गेली तो गुरुद्वारा  म्हणजे कर्तारपूर येथील...

विश्वासाह्य माध्यमांची व्याख्या

इमेज
                  भारतात घडणाऱ्या काही घडामोंडीवर मी फेसबुकवर भाष्य करणाऱ्या पोस्ट पेस्ट केल्या होत्या .त्यावर  प्रतिक्रिया देताना माझ्या फेसबुकवरील मित्रांनी मला एकांगी माध्यमांपासून दूर जात निष्पक्ष माध्यमांनी केलेल्या बातम्या बघण्याचा सल्ला दिला .त्यांनी मला काही माध्यमांची नावेही सुचवली . माझ्या मित्रांच्या मते निष्पक्षी असणारी माध्यमे मुळात एका विशिष्ठ विचारसरणीची असल्याचे मला आढळले .माझ्या मित्रांचा कल देखील त्या विशिष्ठ विचारसरणीकडे असल्याने त्यांनी त्यास निष्पक्ष असल्याचे प्रमाण पत्र दिले होते .                          माझ्या मित्रांना मी कोणत्या माध्यमाचा बातम्या बघतो, हे सांगितल्यावर त्यांनी ते एकांगी , भारताची प्रगती न बघवणार्या समुहाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे सांगितले .  मी बघत असणारी माध्यमे सरकारवर टिका करण्यात आघाडीवर आहेत . त्यामुळे त्यांना एकांगी असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले होते .                 ...