पोस्ट्स

अबतक 531

इमेज
         आज 28 मे 2020 अर्थात महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने  सर्वात मोठ्या असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अहमदनगर शहराचा 531वा वाढदिवस . सध्या प्राप्त असणाऱ्या इतिहासाच्या पुराव्यानुसार अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 साली झाली  त्या अर्थाने आजच्या दिवशी अहमदनगर शहर 531 वर्षाचे झाले . त्या निमित्याने समस्त अहमदनगरवासीयांचे अभिनंदन .             अहमदनगर एकेकाळचे जगातील सर्वात उत्तम शहर . आताच्या काळात आपण जसे मुंबईचे शांघाय करू असे म्हणतो . त्याप्रमाणे जगातील राज्यकर्त्यांनी आम्ही आपल्या शहराचे अहमदनगर करू असे एकेकाळी  निवडणुकीत वचन द्यावे असे शहर .. आपल्या महाराष्ट्राची एसटी पहिल्यांदा ज्या दोन शहरादरम्यान धावली त्यापैकी एक शहर . जगातील मोजक्या अश्या शहरांचा स्थापनादिवस आपणस ज्ञात आहे  त्या  मोजक्या शहरांपैकी एक शहर म्हणजे अहमदनगर . आपल्या भारतात कोणत्याही प्रकारच्या नव्या वाहनांनाबाजारपेठेत येण्यासाठी . ज्या शहरातील चाचणीला सामोरे जावे लागते , ते शहर म्हणजे अहमदनगर ....

भारताची खेळी आणि चीनची कोंडी

इमेज
           सध्या आपल्या भारताच्या शेजारील  असलेले सबंध एका महत्तवाच्या वळणावर आहेत . चीन या देशाबाबत तर अनेक घडामोडी घडत आहे .त्यातील मोजक्या घडामोडीबाबत मराठी प्रसारमध्यमांमध्ये भाष्य करण्यात आले . ज्या घडामोडीबाबत माध्यमांमध्ये सांगण्यात आले त्यामध्ये नेपाळची घुसखोरी, चीन आणि भारतीय लष्कर यामध्ये झालेली झडप आदी मुद्यांचा समावेश करता येतो.मात्र याखेरीज एका महत्तवाच्या मुद्याबाबत मराठी माध्यमांमध्ये काहीही सांगण्यात आलेले मला दिसले नाही, तो म्हणजे तैवान या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला लोकसभेच्या  दोन खासदारांनी लावलेली उपस्थिती .दिल्ली येथून भाजपाच्या खासदार असणाऱ्या मिनाश्री लेखी.आणि राजस्थानतील चुरू येथून  भाजपाचे खासदार असणारे राहुल  कास्वा . ते दोन खासदार.                                               मित्रांनो, आपण ज्याला चीन म्हणतो  ज्याचे अधिकृत नाव आहे ,पिपल्स रिपबल्कीक आँफ चायना (PRC)या देशाचे ...

भारत मालदीव संबंध नव्या वळणावर

इमेज
                       सध्या आपल्या भारताचे  शेजारी देशांशी असणारे संबंध मोठ्या प्रमाणात बदलत आहेत . हे बदल सकारात्मक तसेच नकारात्मक देखील आहेत . जसे नेपाळ आणि चीनबरोबर आपले संबंध काहिस्या तणावपूर्ण अवस्थेतून जात आहेत , तर इस्लाम हा प्रमुख धर्म असणाऱ्या किंबहुना ज्या देशाच्या नागरिकत्वाच्या कायद्यात मुस्लिम धर्मीय असल्याशिवाय नागरिकत्व  मिळणार नाही , अशी तरतूद आहे , त्या  मालदीव बरोबर आपले संबंध मोठ्या प्रमाणात सकारत्मक आहेत . आणि हे संबंध अजूनच सकारत्मक होऊ शकतात . अशी भूमिका मालदीव या देशाने नुकतीच एका आंतरराष्ट्रीय मंचावर घेतली .  सध्या समस्त  मराठी वृत्तवाहिन्या करोनाविषयी  बातम्या देत असल्याने , ही घटना त्यांच्याकडून अनावधाने  सुटली . जर सध्या करोना  नसता तर ही बातमी मोठ्या प्रमाणात गाजली असती यात शंका नाही . मात्र करोनामुळे  ही बातमी गाजली नाही . तरी समर्थ रामदासस्वामी यांच्या , "जेजे आपणासी ठाव, ते सकलांसी सांगावे , शहाणे करुन सोडावे सकल जन " या उक्तीप्रमाणे त्याबाब...

वादाला पुन्हा सुरवात

इमेज
        सध्या समस्त जग  करोनासी  झुंजत असताना गेल्या कित्येक महिन्यापासून  थंडावलेला असा  हाँगकाँगचा चीनबरोबर असणारा  वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे . मागील वर्षी अर्थात सन 2019मध्ये या वादाने जगाचे लक्ष  वेधून घेतले होते . दर शनिवार आणि रविवारी हॉंगकॉंग मध्ये स्थानिक जनता आणि प्रशासन या मध्ये वादाची ठिणगी पडत असे असे . सुमारे सहा सात महिने या संघर्षाच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या . कालांतराने चीनने या ठिकाणी अस्थायी स्वरूपाची  का होईना  शांतता निर्माण केल्याने याविषयीच्या बातम्या माध्यमांमध्ये येणे  बंद झाले . मात्र ही  औटघटकेची शांतता सध्या भंग  होण्याचा मार्गावर आहे .            बीबीसी या वृत्तवाहिनीने दिलेल्या  वृत्तानुसार चीन हॉंगकॉंगच्या स्वायत्तेवर घाला घालणारे एक बिल त्यांच्या  लवकरच होऊ घातलेल्या  नॅशनल कॅव्हेशनमध्ये आणणार आहे . या प्रस्तावित बिलाद्वारे चीन हॉंगकॉंगमधील नागरिकांना  देशद्रोह , राष्ट्रीय सुरक्षेल...

पश्चिम बंगालच्या संकटाने निर्माण केलेले काही अनुत्तरित प्रश्न

इमेज
                          दिनांक 21मे 2020रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यात आलेल्या आम्फाम या अतितीव्र स्वरुपाच्या चक्रीवादळाने 72 निष्पाप अभागी जणांचा मृत्यू झाला आहे . या मृत्यूने  अनेक प्रश्नांंना जन्म दिला आहे  त्यातील अनेक प्रश्न बदलत्या हवामानाशी संबंधित आहेत . .आपण जगभरातली  गेल्या काही वर्षांतील हवामानाचा एक आढावा घेतल्यास आपणास सहज लक्षात येते की , जगभरातील सर्व प्रकारचे हवामान अतितीव्र बनत चाललेले दिसते . मागील 2019पर्यतचा हवामानाचा विचार करता सन 2000पासून पुढची सर्व वर्षे मागच्या पेक्षा अधिक उष्ण होती , तसेच गेल्या काही वर्षाचा विचार करता ऊत्तर अमेरिका खंडातील अटलांटिक समुद्रातील चक्रीवादळे असो (ज्याला हरिकेन म्हणतात ) अथवा मे महिन्यात होणारी बंगालच्या उपसागरात तयार चक्रीवादळे असो अथवा या प्रकारची सर्वच चक्रीवादळे असो , त्यांची तीव्रता वाढलेलीच आपणास दिसते .           पश्चिम बंगालच्या चक्रीवादळाने निर्माण केलेल्या प्रश्नांमध्ये एक प्रमुख प्रश्न आहे की , या...

भारतीय रेल्वेचे पाऊल पडते पुढे

इमेज
                 सध्या करोनमुळे आपल्या भारतातील औद्योगिक क्षेत्र काहीसे मंदावले असले तरी , भारतीय रेल्वेवर त्याचा काहीच परिणाम झालेला दिसून येत नाहीये , उलट भारतीय रेल्वे अधिक वेगाने प्रगती करत आहे, असेच म्हणावे लागेल अशी आजची स्थिती आहे . 26  एप्रिलला आतापर्यंतच्या  मालवाहतुकीसाठी सर्वात वेगवान अश्या WAG 9HH या रेल्वेइंजिनची यशस्वी चाचणी करून महिना पूर्ण होण्याचा आधीच 19एप्रिलला आपल्याला WAG 12B या तस्यांचं वेगवान इंजिनाची काही अपयशी चाचण्यांनंतर यशस्वी चाचणी केल्याची शुभवार्ता रेल्वेकडून देण्यात आल्याने  करोनामुळे  भारतात सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनचा  काहीही परिणाम न   झाल्याचे स्पष्ट होत आहे .                भारतात मालवाहतूक आणि प्रवाशी वाहतूक  यांना एकमेकांच्या अडथळा होऊ नये ,  रेल्वेच्या  महसुलात सर्वाधिक वाटा असणारी मालवाहतूक अधिक वेगवान व्हावी , रेल्वेच्या मालवाहतुकीमुळे रस्तेमार्गे होणारी अवजड ट्रकांची कमी होऊन रस्ते अपघात कमी व्हावे , य...

नेपाळचे बदलते रंग

इमेज
                                   सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे करोनाविषयी वृत्तांकन करत आहेत , हे आपण जाणतातच. करोना महाभयंकर आहेच यात शंका नाही , मात्र त्याचबरोबर भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधावर  परिणाम करणाऱ्या घटना देखील घडत आहेत . भारताचा एक शांततापूर्ण शेजारी देश अशी ख्याती असणाऱ्या नेपाळ या देशात घडलेल्या काही भारतविरोधी घटना या त्यापैकीच एक               भारत नेपाळ सीमा ही एक खुली सीमा असली तरी,  त्यामध्ये उत्तराखंड राज्याला लागून असणाऱ्या भारत नेपाळ सीमेवरील  सुमारे 400चौरस किलोमीटर क्षेत्राबाबत दोन्ही देशात मतभेत आहे . गेल्या दीड एक  वर्षांपासून  हे मतभेद अधिक तीव्र स्वरूप धारण करत आहे . सध्याच्या घडामोडी या याचा क्षेत्राशी संबंधित आहे . आणि या वादाला पार्श्वभूमी आहे ती ब्रिटिश भारत आणि नेपाळ या दरम्यान झालेला करार . या करारान्वये भारत , नेपाळ आणि चीन या तीन देशाच्या सीमारेषा ज्या भागात...