पोस्ट्स

मेरे पिया गये हे रंगून

इमेज
                 सध्या भारताचे आपल्या शेजारी देशांशी असलेले सबंध नव्याने वृद्धिगत होत आहेत. बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार आदी देशांशी आपले सबंध  संबध मैत्रीच्या नव्या वळणावर आहेत . त्यातील बांगलादेशाशी असणाऱ्या घनिष्ट संबंधावर मी याआधीच लिहले आहे . ज्यांना ते वाचायचे असेल त्यांनी या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंकवर क्लीक करावे. मी आता बोलणार आहे .म्यानमार विषयी            आपल्या  सारखाच ब्रिटिशांची वसाहत असणारा म्यानमार या देशाच्या कारभार 1935 पर्यंत भारतातूनच चालवला जात असे . 1935साली म्यानमार आणि भारताचा कारभार स्वतंत्र करण्यात आला .1857 च्या उठावानंतर दिल्लीच्या बादशहाला आणि राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना म्यानमारच्या तुरुंगात कैद करून ठेवले होते तर म्यानमारच्या राजाला रत्नागिरीत कैद करून ठेवले होते . हे आपण जाणतातच . भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि म्यानमारचे राष्ट्रपिता ऑग सांग हे युनाटेड किंगडम मध्ये शिकत असताना एकमेकांचे जवळचे मित्र होते ,  आशियांची स्थापना करत...

चीनचा विळखा ?

इमेज
चीन आपल्या भारताचा एक प्रबळ शत्रू, अनेकांना ज्याचे  नाव घेतले तरी  तळपायाची आग मस्तकात  जाते असे राष्ट्र. आपल्या भारताच्या विरोधात विरोधात अनेक जागतिक व्यासपीठावर अधिकृत अथवा छुप्या पध्द्तीने बाजू घेणारे राष्ट्र . या चीनच्या संदर्भात 3 घडामोडी गेल्या आठवड्याभरात घडल्या. आपल्या पारंपरिक माध्यमांनी या घडामोडीकडे काहीसे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या विषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.                            तर मित्रांनो, बांगलादेशाने चीनला त्यांचे बंदर विकसीत करण्यापासुन रोखल्यानंतर चीनने पाकिस्तानमधील सर्वात मोठे शहर जे त्यांचा सिंध प्रांताची आणि पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे, अस्या कराची जवळील दोन बेटे  विकसीत करण्यासाठी पाकिस्तानबरोबर करार केला आहे. त्यासाठी चीन त्या ठिकाणी त्याचा तळ देखील विकसीत करणार आहे. हे काम सोपे व्हावे यासाठी करोनामुळे लॉक डाऊन असताना पाकिस्तानच्या सरकारने एक अध्यादेश काढला आहे कराचीच्या समुद्रापासून मुंबईचा समुद्र किनारा अत्यंत जवळ आहे, हे आपणास ज्ञात आहेच. त्यामुळे...

हवामान बदल जीवघेणे ?

इमेज
                     ब्लँक अँड व्हाइट चित्रपट असतानाच्या काळातील एक सुप्रसिद्ध गाणे आहे . "किसीका दर्द मिले तो लेले उधार, किसिकी मुस्कुराटो पर हो निगाह, जिना इसिका नाम है!" दुसऱ्यांंचा दुःखाला आपले दु्ःख मानावे, दुसऱ्याचा आनंदाला आपला आनंद मानाने, असा संदेश हे राजकपूर यांच्यावर चित्रीत हे गाणे देते. या गाण्यात सांगितलेली स्थिती आपल्या भारतीयांना अनुभवयास मिळावी असी दुर्देवी परिस्थीती फिलीपाईन्स या पँसिफिक महासागरातील बेटस्वरुपात असणाऱ्या देशावर सध्या आली आहे. या देशाला गोनी या टायफूनने अक्षरशः भिकेला लावले आहे. तेथील रेड काँस या संघटनेच्या चेअरमन रिचर्ड गोर्डान  पत्रकार परीषदेत सांगितल्यानुसार या देशातील काही शहरात 80% घरांचे प्रचंड नुकसान झाले असून संपुर्ण देशात महापूर आलेला आहे. गोनी या टायफुनने आतापर्यतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. पर्यटन आणि उसाच्या उत्पादनावर आधारीत त्यांची अर्थव्यवस्था या टायफूनमुळे शब्दशः  मोडकळीस आली आहे.या आधी दक्षीण कोरीया आणि जपानला विविध टायफूननी तडाखा दिल्याचे आपणास स्मरत असेलच.  आपल्...

असा बालनायक होणे नाही!

इमेज
                 कालचीच गोष्ट आहे. फेसबुकवर सहज पोस्ट बघताना एक पोस्ट दिसली. ज्यामध्ये एका व्यक्तीने पुण्यामध्ये आँफलाईन अथवा आँनलाईन कस्याही पद्धतीने चालेल पण फास्टर फेणेचे अंक मिळतील का ?अशी विचारणा केली होती. ही पोस्ट बघून माझा मनात एक प्रश्न वारंवार मनात येत आहे. तो म्हणजे पुर्वीच्या मराठीत असणारे फास्टर फेणे, बोक्या सातबंडे सारखे बाल नायक परत आपल्या मराठीत होतील का?                       सध्याचा काळातील बालनायक म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल, असे डोरेमाँन, निंज्जा हातोरी, शिनच्यन, हे या बालनायकांच्या पासंगालाही पुरणार नाहीत. छोटा भीम या ईतर बालनायकांच्या पेक्षा काहीसा सरस ठरेल, इतकेच. वासरात लंगडी गाय शहाणी, या तत्वामुळे. मात्र पुणे परीसरातील उरळी कांचन, हडपसर आदी भागातील छोटा गुप्तहेर म्हणून म्हणून लहानमोठ्या व्यक्तींवर गारूड घातलेल्या फास्टर फेणेची काही औरच वेगळी.  फास्टर फेणेची कथा पहिल्यांदा येऊन कैक पिढ्या लोटल्या , तरी त्याची मोहिनी अजून देखील आहे . फास्टर फेणेमध्ये वर्णन...

राजकारणाने दूर सारले, नैसर्गिक आपत्तीने जवळ केले

इमेज
                           "राजकारणाने दूर सारले, नैसर्गिक आपत्तीने जवळ केले", असे म्हणावे लागेल, असी स्थिती नुकतीच जागतिक राजकारणात निर्माण झाली, आणि त्याला निमित्य ठरले , तो तूर्कस्थानच्या इम्रली या राज्यात आलेला शक्तीशाली भुकंप . या भुकंपामुळे ग्रीस या देशाचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ग्रीसचे पंतप्रधान कोस्तास कारामान्लिस यांंनी तूर्कस्थानच्या अध्यक्ष एर्डोगन यांना फोन करुन आपल्या दोन्ही राष्ट्रात राजकीय मतभेद कितीही तीव्र असले तरी या नैसर्गिक संकटाशी आपण एकत्र लढले पाहिजे, असा संदेश दिला . ज्यामुळे जागतिक राजकारणात एक वेगळा संदेश दिला गेला .                           या दोन शत्रू राष्ट्रांना एकत्र येण्यास भाग पडणारा भुकंप (नैसर्गिक) घडला दिनांक 30, आँक्टोबर रोजी जागतिक प्रमाणवेळेनुसार सायंकाळी पाच वाजून वीस  मिनीटांनी.  युरोपिय प्लेट,आफ्रिकन प्लेट, आणि अरेबियन प्लेट या क्षेत्रात एकत्रीत येतात . त्यातील अरेबियन प्लेट ईतर...

अमेरिका जगातील एक क्रमांकाची घाण

इमेज
     सध्या जगात काय चालू आहे? याचा आढावा घेतल्यास फ्रान्समधील घडामोडी या प्रमुखतेने लक्षात येतात. फ्रान्समधील घडामोडीवर विविध प्रकारची प्रतिक्रिया जगभरातून व्यक्त केल्या जात आहेत. मात्र या सर्व प्रकारात चोर सोडून संन्यासाला फाशी हा प्रकार सुरु आहे, हे सहजतेने लक्षात येते. या सर्व घडामोडीमागे अमेरिकेने 1950 ते 1990 या कालावधीत पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका खंडात केलेल्या उचापती जवाबदार असल्याचे याकडे तटस्थतेने बघीतल्यास सहजतेने लक्षात येते. अफगाणिस्तान मधील तालिबानी राजवटीची निर्मिती असो, अथवा लोका़ंची काहीही तक्रार नसताना सदाम हुसेन यांची ईराक मधील सत्ता नष्ट करणे, गडाफीला उत्तर आफ्रिकेतील प्रमुख सत्ताधिश म्हणून प्रस्थापित करणे, जगभरात लोकशाहीचा मक्ता घेतल्यासारखे वागणाऱ्या अमेरीकेने सौदी अरेबियाचा राजेशाहीविषयी कठोर भुमिका न घेणे. नैसर्गिक तेलासाठी या देशांना वापरणे मात्र त्याचे मोल म्हणून या देशात सुधारणा करण्यासाठी आपण काही लागतो,याकडे सौइस्कर दुर्लक्ष करणे,ही अमेरीकेची यासाठी लक्षात येणारी काही प्रमुख दुषकृत्ये. मात्र गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात येणाऱ्या बातम...

वंदन बंडखोर कवियत्रीला

इमेज
ती काळाचा पुढे बघणारी आधूनिक स्त्री होती, ती ज्ञानपीठविजेती कवियत्री आहे. ती हिंदी , पंजाबी भाषेतील ख्यातनाम कवियत्री आहे. फाळणीपुर्व पंजाबात सध्या पाकिस्तानात असणाऱ्या पंजाबात तीचा जन्म झाला होता , तारुण्याचा अवखळपणात तीला अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. सासरच्या मंडळींकडुन प्रचंड अत्याचार सहन करावे लागले, मात्र यातूनच तीची कविता समृद्ध होत गेली.ज्या काळात एखाद्या स्त्रीने विवाहाच्या बंधनात न अडकता परपुरुषाबरोबर राहण्याची कल्पना करणे कोणाच्या मनात येणार नाही, अस्या काळात आपल्यापेक्षा मोठ्या पुरुषाबरोबर लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहिली ती. मी बोलत आहे, हिंदीतील ख्यातनाम कवियत्री ज्ञानपीठ विजेत्या अमृता प्रीतम यांच्याविषयी. 31 आँक्टोबर हा आपल्या भारतातील दोन वेगवेगळ्या क्षेत्रात दिग्गज महिलांचा स्मृती दिन .असतो एक महिला म्हणजे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्यांनी संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बँकांचे राष्ट्रीयीकरण, आँपरेशन ब्लु स्टार, आँपरेशन मुक्तीवाहिनी असे अनेक धाडसी निर्णय घेतले, त्या इंदिरा गांधी होय, आणि दुसऱ्या म्हणजे कवीयत्री अमृता प्रीतम होय .31आँक्टोबर 2005रोजी त्यां...