पोस्ट्स

५९ वर्षाची भळभळती जखम

इमेज
            आजपासून ५९ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही , ऑक्टोबर महिन्याचे दिवस होते ते . भारताच्या उत्तर सीमेवर तणावपूर्ण शांतता होती.  चीनने भारताच्या जमू काश्मीर राज्यातील लडाख भागात चीनने एक रस्ता बांधल्याचे समोर आले होते, त्या घटनेवरून दोन्ही देशांच्या संबंधात काहीशी कटुता आली होती  अश्यातच चीनच्या लष्कराकडून उत्तराखंड राज्यात भारत चीन सीमेवर गस्त घालणाऱ्या इंडो तिबेटियन फोर्सच्या काही  पोलिसांवर १७ ऑक्टोबर रोजी अचानक हल्ला करून त्यांची हत्या केली जाते, आणि भारत चीन यांच्यातील सुप्त तणाव  उघड होतो आणि दोन्ही देशात युद्धाची ठिणगी पडते   आज २०२१ साली या युद्धाला ५९ वर्षे पूर्ण झाली आहे सरकारी नियमानुसार व्यक्ती ६०वर्षाचा झाल्यावर त्यास सेवेतून निवृत्त केले जाते या हिशोबाने या  हल्ल्याचा एक वर्ष आधी जन्मलेली व्यक्ती आता सेवानिवृत्त होईल ,इतकी वर्षे होऊन सुद्धा हि जखम अजून भळभळतीच आहे  . त्या निमित्याने या युद्धात आप्तेष्ट गमावलेल्या लोकांच्या दुःखात सहभागी राहूया.  १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या या हल्ल्याचा स्...

सोने विचाराचे ...

इमेज
          विजयादशमी अर्थात दसरा भारतीय पंरंपरेतील शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त . या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने सोनेरूपी देऊन एकमेकांचे सुयश चिंतण्याची प्रथा आहे उत्तर भारतात  निमित्याने गेली ९ दिवस सुरु असणाऱ्या रामकथेचा शेवट रावणदहनाने करण्याची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राचा विचार करता या दिवशी होणाऱ्या दोन विशेष कार्यक्रमाला अनन्य साधारण महत्व आहे . एक म्हणजे मुंबईतील दादर भागातील शिवाजी पार्कच्या मैदानावर होणारे हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जनतेला असणारे संबोधन आणि दुसरे म्हणजे नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालकांचे संघाच्या स्वयंसेवकाला संबोधित करून होणारे  होणारे संबोधन . बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांचे पुत्र आणि विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हहे त्यांच्या वतीने जनतेला संबोधित करतात . या दोन्ही भाषणांना आपल्या महाराष्ट्रात विचारांचे सोने म्हणण्याची परंपरा आहे . स्वयंसेवकांना उद्देशून असणारे संबोधन हे सकाळी असते तर शिवसेना प्रमुखांचे संबोधन साय...

ब बुद्धिबळाचा (भाग 13)

इमेज
                         13 ऑक्टोबरला बहुसंख्य भारतीय आय पी एल मधील  कोलकाता नाईट रायडर्स  विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्याची मज्जा लुटत असताना बुद्धिबळाचा क्षेत्रातून एक अत्यंत आनंदायी बातमी येऊन धडकली . नागपूरच्या  रहिवाशी असणाऱ्या दिव्या देशमुख  या 15 वर्षीय बुद्धिबळपटूने " वूमन ग्रँडमास्टर हा 'किताब पटकावल्याची ती बातमी होती  दिव्या देशमुख अशी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या  पाचव्या आणि भारताच्या  21 व्या महिला खेळाडू आहेत .वूमन ग्रँडमास्टर हा बुद्धिबळाची आंतराष्ट्रीय संघटना फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल दि ए चेस अर्थात फिडे कडून देण्यात येणार सम्मान असतो जो  बुद्धिबळपटूने विशिष्ठ गुणवत्ता गाठल्यानंतर देण्यात येतो            हंगेरी या युरोपातील देशाच्या राजधानीत सूर असणाऱ्या  First Saturday Grandmaster chess tournament या स्पर्धेत नऊ डावात तीन विजय चार बरोबरी  तर दोन डाव गमावत एकूण 5 गुण प्राप्त करत हि दैदिप्तमान कामगिरी केलीआहे . या ...

अन्य देत नाही, मग आपण का देयचे ?

इमेज
                             १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी  गेल्या काही  वर्षांपासून एसटीला मानव विकास कार्यक्रअंतर्गत  देय असणारे देयके   देण्यास महाराष्ट्र राज्य सरकारने परवानगी देण्याची बातमी येऊन धडकली.  ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न काही अंशी सुटल्याचे या बातमीत सांगितले होते  महामंडळ ग्रामीण विद्यर्थ्यांना शिक्षण घेणे सोईचे व्हावे यासाठी भाड्यात विशेष सवलती देण्याचा  उपक्रम काही वर्षांपूर्वी महामंडळाने राबवला होता त्यामध्ये होणारा तोटा सरकारकडून भरून दिला जाणार होता . मात्र सरकारकडून हे देणे कित्यके वर्षे देण्यात आले नव्हते .ज्यामुळे महामंडळाला होणारा तोटा भरून निघत नव्हता . याचा काही अंशी परिणाम महामंडळाचा संचित तोटा होण्यास झाली महामंडळाने यासाठी साध्या  गाडयांना आकर्षक आकाशी रंग देखील दिला होता .        महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपल्या भारतात सर्वाधिक सवलती देते असे सांगितले  जाते . तेव्हापासून मला प्रश्न पडला आहे की...

तैवानचा चीनवर पलटवार

इमेज
                   सध्या आपल्या भारतातील आणि महाराष्ट्रातील माध्यमे शेतकरी आंदोलांवरून देशात आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकारणाच्या बातम्य देण्यात मग्न असताना जगाचा विचार करता चीनबाबत नाट्यमय घडामोडी घडत आहेत .हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तम उत्तर असते , याची आठवण ठेवत तैवानबाबाबत वागग्रस्त विधान करत आक्रमक राष्टवादाला खतपाणी घालणाऱ्या चीनच्या  सत्ताधीशांना तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी तितकेच आक्रमक उत्तर दिले आहे .               रविवारी  १० ऑक्टोबर रोजी  तैवानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्याने तेथील जनतेला संबोधित करताना तैवानच्या राष्ट्राध्यक्षा  त्साई इंग-वेन यांनी,  तैवान कधीही चीनपुढे दंडवत घालून आपली लोकशाही गुंढाळून ठेवणार नाही आमच्या जन्म त्यासाठी झालेला नाही असे विधान केले आहे चीनने तैवानच्या हवाई हद्दीचा केलेल्या भंगामुळे गेल्या ७२ वर्षात नव्हते इतका तणाव निर्माण होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले  तैवान  कोणताही उतावळेपणा करणार नाही मात्र कोणी ...

प्रवाश्याचा सेवेसाठी ..महाराष्ट्र एसटी

इमेज
        आपल्या महाराष्ट्राच्या एसटीचे २ बोधवाक्य आहेत  . पहिले म्हणजे प्रवाश्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र एसटी  दुसरे म्हणजे गाव तिथे एसटी . आपली महाराष्ट्राची एसटी हे दोन्ही बोधवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत असते .आपली आर्थिक स्थिती नाजूक असताना देखील एसटी आपल्या या बोधवाक्यापासून ढळलेली नाही  नाजूक आर्थिक स्थिती असताना देखील प्रवाश्याना अधिक चांगली सेवा देण्याचा एसटी प्रयत्न करत आहे सध्याचे जग तंत्रज्ञानाचे आहे याची जाण ठेवत एसटीने आपल्या अँपमध्ये . केलेले बदल याचीच साक्ष देत आहेत  महाराष्ट्र राज्य परिवहन चे GPS तंत्रज्ञान वर आधारित MSRTC Commuter हे Vehicle Tracking अँप नव्याने प्रवाश्यांचा सेवेत रुजू झाले आहे . पूर्वीच्या ऍपच्या तुलनेत नव्या ऍपमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. नवीन अँप ची थीम पांढऱ्या रंगात आहे जी पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक वाटते  ह्या अँप मधील सर्व सुविधा आपण आता बघूया         आपली बस नक्की कुठे आहे याची वाट बघणे आता संपले आहे नव्या ऍपमध्ये . Track Yo...

या धोक्याकडे कोण बघणार

इमेज
                               आपल्या भारतात विविध राजकीय नेत्यांमध्ये विविध आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी झाडल्या जात असताना एक फार मोठा धोका आपल्याकडे आवासून उभा आहे . मात्र विविध नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपणाच्या बातम्या देण्यात माध्यमे गुंतून गेल्याने या धोक्याकडे कोणाचेच लक्ष नाहीये  हा धोका आहे भूकंपाचा आणि ज्वालामुखी उद्रेकाचा  . गेल्या काही महिन्यातील  भुकंपाच्या आणि ज्वालामुखी उद्रेकाच्या वाढत्या घटना बघता याचे गांभीर्य लक्षात येते .(  https://www.volcanodiscovery.com   या संकेतस्थळावर तुम्ही जगभरात दररोज  किती भूकंप होत आहेत याची प्रदेशनिहाय आणि तीव्रतानिहाय माहिती घेऊ शकतात . हा लेख याच माहितीवर अवलूंबून आहे )  आपल्या उत्तर भारतात मोठा विध्यसंक भूकंप येण्याची दाट शक्यता या आधीच भूकंप तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेच . त्या पार्श्वभूमीवर  या आकडेवारीकडे बघायला हवे  आपण या धोक्याला सर्मथपणे पेलू शकतो का या  उत्तर जर दुर्दैवाने नकारत्मक असेल तर आपण का...