पोस्ट्स

चीनचे शेपुट वाकडेच

इमेज
   भारताचा शत्रू असणारा चीन गेल्या आठवड्यात दोनदा चर्चेत आला होता. दोन्ही वेळेस त्याचा सबंध भारताशी होता.चीन आपला शत्रू असल्याने त्याविषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे, तरी समर्थ रामदास स्वामी यांच्या "जे जे आपणास ठाव ते सकलांशी सांगावे, शहाणे करुन सोडावे सकल जन" या उक्तीनुसार सांगण्यासाठी आजचे लेखन.       तर मित्रांनो चीन पाकिस्तानला अत्यंत अत्याधुनिक अस्या आवाजाच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त वेगाने खुप जास्त अंतर जावू शकेल ,असे क्षेपणास्त्र देवू शकण्याची अमेरीकन थिंक टँंक असणाऱ्या "इंटरनँशनल असायमेंट अँड स्ट्रेटेजी सेंटर कडून व्यक्त करण्यात आली आहे. या संस्थेकडून व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार हे क्षेपणास्त्र भारत रशियाकडून विकत घेत असलेल्या एस 400 या क्षेपणास्त्राला तोंड देवू शकतो .या संस्थेत रिचर्ड डि फिशर हे चीनविषयक मोठे तज्ज्ञ कार्यरत आहेत. त्यांचा मते या आधीच चीनने हे क्षेपणास्त्र उत्तर कोरीयाला दिले आहे. पाकिस्तानबाबत चीन तीच गोष्ट करु शकतो.जर पाकिस्तानला अधिकृतपणे देता आले नाही तर उत्तर कोरीयाच्या मार्फत चीन पाकिस्तानला हे तंत्रज्ञान देवू शकतो. त्य...

मध्य आशिया आणि भारत सहकाऱ्यांचा नवा सेतू

इमेज
                      मध्य आशिया  भागातील किरिगिस्तान उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान तझकिस्तान किर्गिस्तान या पाच मुस्लिम बांधांवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या देशांशी भारताचे पूर्वापार संबंध आहेत  युरोपाशी जमिनीच्या मार्गावरून व्यापार करण्याच्या मार्गातील अत्यंत मोक्याच्या स्थानी हे देश वसले आहेत सिल्क रूट या नावाने हा मार्ग परिचित होता या मार्गाने आपल्या भारतावर अनेक आक्रमक सुद्धा आले भारतातील मुघल घराण्याचा संस्थापक बाबर या  देशातील उझबेकिस्तान या देशातील समरकंद या भागातील मुळचा  रहिवाशी होता स्वतंत्र भारताचे भारताचे दुसरेपूर्णवेळ पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर  याच भागातील उझबेकिस्तान या देशाच्या राजधानीच्या तास्कंद या शहरात करारासाठी गेला असता संशयास्पद दुर्दैवी मृत्यू झाला  १९१ साली युनाटेड सेव्हियात सोशालिस्ट रशिया विसर्जीत झाल्यावर मधल्या काही काळात मात्र आपला त्यांच्याशी असणारा संपर्क तुटला         पंतप्रधानपदी...

भारतीय रेल्वे बदलतीये !...

इमेज
        आपली भारतीय रेल्वे झपाट्याने बदलत आहे. येत्या काही वर्षात आपण बघीतलेली भारतीय रेल्वे ती हीच का? असा प्रश्न पडावा असे बदल भारतीय रेल्वेत होत आहेत. सगळ्या भारताच्या परीवहन व्यवस्थेचा कणा म्हणून भारतीय रेल्वे ओळखली जाते .आज 2022मध्ये देखील विमान प्रवास सर्वसामान्य भारतीयांंचा पुर्णतः अंगवळणी पडलेला नाही. तर अस्या भारतीय रेल्वेत येत्या वर्ष दीड वर्षात होणारे बदल बघूया  1)100% विद्यूतीकरण : भारतीय रेल्वेतून कर्बवायूचे उत्सर्जन शुन्य व्हावे.भारतीय रेल्वे पुर्णतः प्रदूषण मुक्त व्हावी, यासाठी भारतीय रेल्वे प्रकाश्याला लाजवेल या वेगाने आपल्या डिझेल इंजिनावर चालणाऱ्या मार्गाचे विद्युतीकरण करत आहे रेल्वेच्या अंदाजानुसार डिसेंबर 23 पर्यत रेल्वेचे पुर्णतः विद्युतीकरण होईल. आजमितीस 75%पेक्षा अधिक रेल्वे विद्युत इंजिनावर धावत आहे विद्यूतीकरण व्हावे यासाठी इशान्य भारतात रेल्वे विशेष प्रयत्न करत आहे. रेल्वेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपण त्याची प्रगती बघू शकतो. 2) डेडीकेडेट फ्रेड काँरीडाँर : भारतीय रेल्वेच्या महसुलातील खुप मोठा हिस्सा माल वाहतूकीचा आहे. मात्र रेल्वेचा जाळ्...

आत्महत्या: एक सामाजिक समस्या

इमेज
  आपले निर्माण करण्यात आलेले खोटे प्रतिष्ठेचे प्रश्न बाजूला ठेवून, आत्महत्या या गंभीर समस्येवर  आपण एकदिलाने काम करायची गरज असल्याचे, नाशिकमध्ये गेल्या वर्षभर झालेल्या आत्महत्येच्य संख्येने दाखवून दिले आहे. नाशिकसारख्या मध्यम आकाराच्या शहरात गेल्या वर्षी तब्बल ४१९  आत्महत्या झाल्या आहेत. सध्या कोव्हिड १९ च्या उद्रेकामुळे ताणतणावात वाढ झाली आहे, येत्या वर्षभरात जीवन पुर्वपदावर आल्यावर, या वाढलेल्या आत्महत्या देखील कमी होतील, असे मानने भाबडेपणाचे ठरेल. .  एखाद्याला वरकरणी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी दुसऱ्या साठी खुप मोठ्या वाटू शकतात. त्यामुळे आत्महत्या या वरकरणी शुल्लक कारणासाठी होत आहेत, असे वाटत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. किंबहुना क्षुल्लक कारण एखाद्याला मोठे वाटते , हे आपले मानसिक आरोग्य किती धोकादायक स्थितीत आले आहेत, याचा वस्तस्थितीदर्शक पुरावाच मानावा लागेल.ज्याला यातील गांभीर्य समजेल त्याला यातील दाहकता समजेल  रस्त्यावर विचित्र पद्धतीने पुटपुटत, हातवारे करत फिरताना दिसणारे लोक म्हणजेच मानसिक रोगी, ही मानसिक रोगाची संकल्पना आपल्या समाजात मोठ्या प्...

केंद्र राज्य संबंध पुन्हा एकदा तणावाचे!

इमेज
     केंद्र सरकार आणि देशातील राज्य सरकारे यांचे परस्पर सबंध गेल्या काही महिन्यात अनेकदा तणावाचे झाले आहेत. तसेच ते 13 जानेवारीला, केंद्र सरकारच्या  Departtment Of Persnonal Traning ने   विविध राज्यात आपली सेवा देणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची केंद्र शासनात प्रतीनियुक्तीवर नियुक्ती करण्यावरुन घेतलेल्या निर्णयावरून झाले आहेत. या निर्णयानुसार केंद्र सरकार त्यांना हवे तितके अधिकारी एखाद्या राज्यातून प्रतिनियुक्तीवर घेवू शकते, तसेच केंद्राने मागितलेल्या संख्येएव्हढे अधिकारी पुरवणे राज्यांना बंधनकारक ठरणार आहे. तसेच केंद्र सरकारला एखाद्या अधिकाऱ्याला त्याचा विषय तज्ज्ञतेमुळे केंद्र सरकारच्या सेवेत घ्यावेसे वाटले, तर घेता येणार आहे..इंडियन अँडमिस्टेशन सर्व्हिस, इंडियन  पोलीस सर्व्हिस, आणि इंडियन फाँरेस्ट सर्व्हिस मधील अधिकाऱ्यांंबाबत ही बंधने असणार आहेत.         या प्रस्तावाला भाजपाशासित राज्यांसह अनेक राज्यांनी विरोध केला आहे .राज्यातील प्रशासन यामुळे पुर्णतः कोलमडून पडू शकते. संघराज्य पद्धतीवर हा मोठा आघात आहे, अस्या प्रकार...

भारत अमेरिका संबंधात कटुता ?

इमेज
भारत आणि अमेरिका या  देशांमध्ये संबंधात कटुता तर   निर्माण होणार नाहीना ? अशी शंका उपस्थित करणारी एक घडामोड नुकतीच घडली. त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन तर जगात मुक्तपणे व्यापार व्हावा, यासाठी कार्यरत असणाऱ्या, जागतिक व्यापार संघटनेने(WTO) जागतिक व्यापारात सर्वांना समान संधी मिळाव्यात,  या हेतूने सबसिडीबाबत काही बंधने घातली आहेत. त्यातील गहु उत्पादनाविषयीच्या तरतूदींचे भारताच्या सरकारकडून उल्लंधन होत आहे, ज्यामुळे भारतीय गहु उत्पादन आणि अमेरीकी गहु उत्पादक यांच्यात निकोप स्पर्धा होत नाहीये, तरी जागतिक व्यापारी संघटनेने आवश्यक ती पाउले उचलण्यासाठी अमेरीकेने जागतिक व्यापार संघटनेवर दबाब टाकावा ,असी मागणी काही अमेरीकी क्राँग्रेसच्या सदस्यांनी बायडन प्रशासनाकडे केली आहे. त्यांचा मते भारतासारख्या विकसनशील देशांना उत्पादन खर्च्याचा जास्तीत जास्त 10% सबसिडी देण्यास मान्यता असताना ,भारत आपल्या गहु उत्पादकांना तब्बल 50% थोडी अधिक सबसिडी देत आहे. जे जागतिक व्यापार संघटनेच्या तत्वाचा विरोधात असल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे. ही मागणी प्राथमिक  स्तरावरची आहे . ही मागण...

पाकिस्तानची वाटचाल कुठे चाललीये ?

इमेज
       पाकिस्तानची  वाटचाल कुठे चाललीये ?  अश्या घटना सध्या पाकिस्तानात घडत आहेत.ग्वादर या बंदरावर चीनी दादागिरीबाबत महिन्याहुन अधिक काळ आंदोलन सुरु होते.ते शांत होते ना होतेच तोच, 20 जानेवारी 2022 या दिवशी पाकिस्तानमधील दुसरे मोठे शहर, जे पाकिस्तानमधील सर्वात प्रभावशाली प्रांत असणाऱ्या पंजाब प्रांताची राजधानी आहे, आणि पाकिस्तानातील एकमेव मेट्रो सर्व्हिस ज्या शहरात सुरु आहे, जे शहर भगवान श्रीराम यांच्या मुलगा लव यांनी वसवले असी मान्यता आहे, त्या लाहोरमध्ये  बाँम्बस्फोट झाला.ज्याची जवाबदारी बलूचिस्तान नँशलिस्ट आर्मी या संघटनेने त्यांचा टेलीग्राम अकाउंटद्वारे घेतली आहे. ही संघटना बलूचीस्थानचा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या चार प्रमुख  संघटनांपैकी असणाऱ्या युनाटेड बलूच आर्मी, आणि बलूच रिपब्लिकन आर्मी या दोन संघटनांचा एकत्रीकरणातून जन्माला आलेली संघटना आहे. या दोन संघटनांमध्ये बलूच रिपब्लिकन आर्मी ही संघटना तीच्या हिंसक कारवायांसाठी प्रसिद्ध आहे.  या दोन संघटनांनंतर बलूच  लिबरेशन फ्रंट आणि बलूचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटना बलुचीस्तानच्या स्वातंत...