पोस्ट्स

आत्महत्येच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेले प्रश्न

इमेज
                आत्महत्या आजमितीस भारतातील  एक ज्वलंत समस्या आहे,  हे पुन्हा एकदा भारतात पुन्हा  झाले,  एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी सन २०१८ ते २०२० या तीन वर्षात तब्ब्ल २५ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती  दिली,  नित्यानंद रॉय  यांनी ही  माहिती  नॅशनल क्राईम ब्युरोकडे असणाऱ्या आकडेवारीनुसार दिली या आकडेवारीनुसार देशातील मानसिक आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा सिद्द झाले आहे आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या सदस्यांची अधिकत्तम मर्यादा १७ हजार आहे गावाची लोकसंख्या २५ हजार झाली की त्या शहरात नगरपंचायत स्थापन झालीच पाहिजे असे शासनाचे निर्देश आहेत त्या आकडेवरीनुसार महाराष्ट्रातील एखाद्या नगरपंचायतीच्या शहाराएव्हढ्या लोकांनी आत्महत्या केल्या आहेत . जे खरोखरीच धोकादायक चिंताजनक आहे . आपल्या देशाची लोकसंख्या १२५ कोटी आहे देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सातवा क्रमांकाचा देश आहे त्या देशात तीन वर्षात २५ हजार म्हणजे काही विशेष नाहीय असे समजणे ...

नाशिक जिल्ह्याचा बुद्धिबळ संघ ठरवण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

इमेज
        आपल्या पैकी बहुतेक सर्वांनाच कोणत्या तरी संस्थेचे खेळाचे प्रतिनिधित्व करण्यास आवडते आपण अमुक एका संस्थेचे प्रतिनिधित्व करतोय हे सांगताना अनेकांना स्वर्ग दोन बोटेच शिल्लक राहतो येन केन प्रकारेण आपल्याला एखाद्या संस्थेचे प्रतिनिधित्व करायला मिळावे यासाठी अनेकजण जीवाचे अक्षरशः जीवाचे रान करतात , त्यातही हे  प्रतिनिधित्व बुद्धीचे श्रेष्ठत्व  सिद्ध करणाऱ्या बुद्धिबळ सारख्या खेळातील असेल तर मग काय विचारायलाच नको अनेकांना जग जिंकल्याचाच अनुभव असतो तो आपल्या सुदैवाने नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेमुळे आपणस तो अनुभव मिळणार आहे नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना येत्या र्तविवारी तो अनुभव घेण्याची संधी देत आहे    महाराष्ट्र राज्याच्या बुद्धिबळ संघाच्या निवडीसाठी , पाठवण्यत येणारा  नाशिक जिल्ह्याचा   बुद्धिबळ संघ ठरवण्यासाठी ,  नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . रविवार १३ फेब्रुवारी रोजी ही बुद्धिबळ स्पर्धा होईल .यात पहिल्या चार जणात  येणारे पुरुष आणि महिला खेळाडू नाशिक येथे होणाऱ्या  म...

२०२२ -२३ च्या अर्थसंकल्पात रेल्वेचा विचार करता महाराष्ट्राला काय मिळाले ?

इमेज
                  नुकताच आपल्या भारताचा आर्थिक वर्ष २०२२-२३ चा अर्थसंकल्पात जाहीर झाला.  सन २०१६ साली १९२३ पासून सुरु असणारी प्रक्रिया खंडित झाली आणि रेल्वे अर्थसंकल्प मूळ अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला , ज्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात होणाऱ्या विविध घोषणा थांबल्या.  ज्यामध्ये येणाऱ्या वर्षात सुरु होणाऱ्या प्रवाशी रेल्वेगाड्या , रेल्वेतर्फे होणारे विविध विकासकामे जसे नव्या मार्गाची निर्मिती , अस्तित्वात असणाऱ्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण तिहेरीकरण  , गेज बदलणे, डिझेल मार्गाचे विद्युतीकरण वगैरे .आज ज्या प्रमाणे पूर्वी  इतर मंत्रालयाच्याबाबत  तरतुदी घोषित केल्या जात  असत त्याच प्रमाणे रेल्वेबाबतच्या तरतुदी घोषित केल्या जातात.  मात्र त्यामुळे प्रत्येक गोष्टीला किती खर्च आला या विषयी सविस्तर माहिती अर्थसंकल्पाच्यावेळी मिळत नाही रेल्वे मंत्रालयाकडून अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर काही दिवसानी  याबाबत विभागनिहाय माहिती प्रसिद्ध करण्यात येते जसे की मध्य रेल्वेच्या अंतर्गत पुढील कामांसाठी इतके रुपय...

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेची गगन भरारी ऑनलाईन स्पर्धेचे यशस्वी आयोजन

इमेज
              खेळामुळे मन ताजेतवाने होते , मनावरचा ताण सहजतेने निघून जातो . मेंदू नवनवीन आव्हाने स्विकारण्यास नव्याने तयार होतो . कोव्हीड १९ मुळे आपल्या सर्वांवर प्रचंड   प्रमाणात अतिरिक्त ताण आलेला आहे . ज्यामुळे आपण सर्वांनी खेळणे अत्यावश्यक आहे सध्याचा कोव्हिडचा पार्श्वभुमीवर प्रत्यक्ष समोरासमोर खेळाची स्पर्धा घेणे अवघड आहे . मात्र बुद्धीबळ , सुडोकू , सारख्या बौद्धिक खेळाच्या स्पर्धा घेण्यास काहीच अडचण नाही . तसेच नुकतेच केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक   ग्रँडमास्टरला अभिजीत कुंटे यांना मेजर ध्यानचंद   पुरस्कार जाहिर झाला आहे .  जी समस्त बुद्धीबळ प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची घटना आहे . गेल्या ७५ वर्षात कोणत्याही बुद्धिबळपटुला केंद्र सरकारकडून हा पुरस्कार देण्यात आलेला नव्हता . हा आनंद साजरा करण्यासाठी आणि खेळाचे सध्याचा काळातील महत्व लक्षात घेवून नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून ...

बुडत्याला काडीचा तर पाकिस्तानला चीनचा आधार

इमेज
             आपल्याकडे बुडत्याला काडीचा आधार अशी म्हण आहे,  एखादा मोठा संकटात असताना त्यास केलेली छोटीसी मदत देखील खूप महत्वाची ठरते . असा या म्हणीचा अर्थ आहे .  सध्याचा काळात या म्हणीचा अनुभव पाकिस्तान घेत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही पाकिस्तानच्या बाबतीत ही काडीची भूमिका बजवात आहे आपले शत्रू राष्ट्र चीन . चीनने पाकिस्तानला गेल्या आठवड्यात दोन गोष्टींबाबत मदत केली एक गोष्ट शास्त्रांबाबत होती तर दुसरी होती आर्थिक विषयक पाकिस्तानचे सौदी अरेबिया सारखे मित्र पाकिस्तानमधील गुंतवणुकीबाबत नकारात्मक विचार करताना तसेच दुसरा मित्र तुर्कीये ( तुर्की ) स्वतःच्या देशांतर्गत समस्येत व्यस्त असताना चीनची मदत पाकिस्तानला खूप मोठी साह्य करणारी ठरत आहे स्वामी समर्थांच्या जे जे आपणासी ठाव ते सकळांसी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन या उक्तीनुसार त्याविषयी सांगण्यासाठी हे लेखन           तर पाकिस्तानाने चीनकडून ३ अब्ज अमेरिकी डॉलर कर्जाची मागणी केली आहे . चीनमध्ये सुरु असणाऱ्या हिवाळी  ऑलम्पिक नांतर  पाकिस्तानचे...

पाकिस्तानच्या आर्थिक अरिष्ट्यात वाढ

इमेज
                 पाकिस्तानच्या आर्थिक अरिष्ट्यात दिवसोंदिवस  वाढच होताना दिसत आहे .  पाकिस्तानचे परकीय चलनमुळात कमी असताना ते मोठ्या झपाट्याने कमी होत आहे परकीय चलन मिळवण्याचे मार्ग सुद्धा दिवसोंदिवस कमी होत चालले आहे  पाकिस्तानच्या डोक्यावरचे परदेशी कर्ज बघून सुद्धा आय एम एफ सुद्धा बेलआऊट पॅकेज देण्यास फारशी इच्छुक नाही जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नव्याने कर्ज घेण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे  अनेक मिनतवाऱ्या करून सुद्धा परदेशी गुंतवणूकदार पाकिस्तानात गुंतवणूक करायला तयार नाहीत या आधी ज्यांनी गुंतवणूक करू असे,  सांगितले होते ते देश सुद्धा आत हात आखडता घेत आहे या हात आखडता घेण्यात नुकताच पाकिस्तानचा मित्र देश सौदी अरेबिया देखील सहभागी झाला आहे आजपासून सुमरे तीन वर्षांपूर्वी सौदी अरेबियाने पाकिस्तानात तब्बल २० अब्ज अमेरिकी डॉलर गुंतवूणक करण्याचे ठरवले होते.  ही गुंतवणूक सौदी अरेबिया पाकिस्तानातील विविध विकास कामामध्ये करणार होता  त्यातील बलुचिस्तानमधील तेल विहिरींबाबत सौदी अरेबियाने या आधी...

वाहतूक सुरक्षा रामभरोसे ,हे दुर्देवच

इमेज
         देशातील वाहतूक सुरक्षा राम भरोसेच आहे, हे शुक्रवार 5फेब्रुवारी रोजी नाशिककरांनी अनुभवले. नाशिक औरंगाबाद रस्त्यावरील कैलासनगर चौफुली येथे एक मालट्रक आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांची वाहतूक करणाऱ्या बसचा मोठा अपघात झाला.यावेळी बस पलटी झाली आणि  रक्ताचा थारोळ्याने सर्व परीसर लालेलाल झाला.बसमधील काही विद्यार्थी रुग्णालयात जीवन मरणाची झुंज देत आहेत. काही दिवसापुर्वीच भाजपाच्या एका आमदाराच्या मुलाचा त्याचा सहा मित्रांसह अपघाती मृत्यू झाल्याचे आपणास माहिती असेलच. या घटना देशातील वाहतूक व्यवस्था राम भरोसेच असल्याचे स्षष्ट करत आहे.                चांगले झालेले रस्ते हे वाहतूक सुरळीत होण्यासाठी आहे, हे रस्ते अतिवेगात चालवण्यासाठी नाहीत, याचा विसर पडल्याने प्रचंड वेगात वाहने चालवण्याची स्पर्धाच सध्या भारतात सुरु आहे. त्यामुळे या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. वेगात वाहने चालवण्याबरोबर दुभाजकामुळे समोरच्या रस्त्यावर जाण्यास, लांबच्या मार्ग अवलंबावा लागत असल्यास, ऐकरी मार्ग सोडून विरुद्ध दिशेने वाहन ...