पोस्ट्स

भारताचे बदलते परराष्ट्र धोरण

इमेज
मालदीव , आपल्या भारताच्या नैऋत्य दिशेला असणारे शेजारचे राष्ट्र . जागतिक राजकारणाचा विचार करता , अत्यंत महत्त्वाचा ठिकाणी वसलेले विविध बेटांच्या स्वरुपातील राष्ट्र असणारे मालदिव आपल्या न्यूजमध्ये फारसे नसतेच . भारताचा महत्तवाचा सहभाग असलेल्या सार्क आणि बिमस्टेक मधील भारताचा अत्यंत विश्वासू साथीदार ज्याने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील काश्मीरविषय रडारडीला स्वतः इस्लामाधारीत राष्ट्र असून देखील नेहमीच विरोध केला आहे . तो देश म्हणजे मालदिव . तर अस्या मालदिवचे राष्टपती इब्राहिम मोहम्मद सोलिह आँगस्टच्या पहिल्या आठवड्यात चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत .      या दौऱ्यावर दरम्यान मालदिव आणि भारताचे दळणवळाच्या पायाभुत सोईसुविधांची निर्मिती , सायबर सिक्युरिटी , पारंपरिक शस्त्रसज्जता , व्यापार आणि सांस्कृतिक सबंध   विविध सहा बाबींवर करार करण्यात आले . या अंतर्गत भारत मालदिवची राजधानी माले , राजधानी शेजारच्या बेटांशी जोडण्यासाठी एकुण साडेसहा किलोमीटरचा पुल बांध...

भारताच्या आसपासचे आर्थिक अरिष्टय

इमेज
         आपल्या भारताभोवती असणाऱ्या  नउ देशांपैकी पाच देशांची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. सभोवतालच्या देशांची गंभीर आर्थिक स्थिती भारतासाठी सुद्धा फारसी सुखावणारी नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका हे ते देश. यातील श्रीलंकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अत्यंत अवघड जवळपास अशक्यप्राय स्थितीत पोहोचल्याचे आपणास माहिती आहेच. तेथील माजी पंतप्रधान आणि विद्यमान राष्टपती रणिला विक्रमसिघे यांनी पंतप्रधान पदावर कार्यरत असताना तेथील संसदेत श्रीलंका दिवाळखोर झाल्याचे जाहिर सुद्धा केले होते.त्यामुळे श्रीलंका आणि अफगाणिस्तान मधील आर्थिक स्थिती चिंताजनक असली तरी पाकिस्तानने अनधिकृत ताब्यात ठेवलेल्या काश्मीरमुळे त्यांचा आर्थिक विपन्नतेचा भारतावर काहीसा कमी परीणाम होइल म्हणून अफगाणिस्तानचा देखील अपवाद केला तरी पाकिस्तान नेपाळ बांगलादेश मधील आर्थिक आरीष्ठ भारतापुढे मोठी डोकेदुखी ठरु शकते.         पाकिस्तान नेपाळ, बांगलादेश हे देश परकीय चलनाचा कमी साठ्याचा समस्येशी झूंजत आहेत. देशातील परकीय चलनाचा साठा कमी होवू नये, म्हणून नेपाळने आ...

6वर्षापुर्वीची ती काळरात्र

इमेज
             पावसाचे दिवस होते ते .  पावसाची अगदी मुसळधार बॅटिंग चालू होती . त्यामुळे सर्वच नदी नाल्यांना पूर आले होते . कोकणांत तर पाऊस आपले सर्वस्व ओतल्यासारखा पाऊस कोसळत होता . मात्र चाकरमाने याही पावसात आपले नित्य व्यवहार करतच होते . रहाटगाडगी कोणाला चुकलीये . या नित्यव्यवहाराच्या रहाटगाड्यासाठी तळकोकणातून म्हणजेच  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून माणसे मुबईच्या दिशेने निघाले होते . काही कारणाने रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने ती माणसे आपल्या एसटी बसच्या माध्यमातून प्रवास करत होती मुंबई गोवा या म्हणायला राष्ट्रीय महामार्ग  मात्र ज्याची अवस्था एखाद्या ग्रामपंचायतीच्या रस्त्यासारखीच आहे अश्या रस्त्यावरून प्रवास करत होती . पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु असल्याने  समोरचे काही फारसे दिसत नव्हते जे थोडेफार दिसत होते त्यामध्ये सर्वत्र नुसते पाणी आणि पाणीच . गाडीने तळकोकण आणि उत्तर कोकण यांच्या सीमेपर्यंत प्रवास केला ही सीमा सावित्री नावाची नदी ठरवते समुद्राच्या दिशेने तोंड उभे करून राहिले तर उजव्या हाताला रायगड जिल्हा अर्थात...

पंडीत नेहरुंचे हे थोरपणच !

इमेज
    आपल्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मु यांनी नुकतीच शपथ घेतली. त्या आदिवासी (वनवासी) समाजाच्या आहेत. या समाजातून देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत. आतापर्यत आपल्या भारतात अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजबांधवातून ,तसेच शीख धर्मियातून ,दलित समाजबांधवातून आणि अत्यल्प असणाऱ्या ख्रिचन समाजबांधवातून आलेल्या व्यक्तींनी राष्ट्रपती पद भुषवले आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही किती खोलवर रुजली आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. लोकशाही इतक्या खोलवर रूजवण्याचे काम करणाऱ्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहारलाल नेहरु आणि अन्य तत्कालीक नेत्यांचे आपण कायमच कृतज्ञ असू. दुसऱ्या महायुद्धानंतर पुढच्या तीन ते चार वर्षांत जगभरात सुमारे 90 देश वसाहतवादाच्या रोखडातून मुक्त झाले.या स्वातंत्र्य झालेल्या देशांनी लोकशाहीची विविध रूपे स्विकारली. आज सुमारे 75 वर्षानंतर या देशातील लोकशाही कोणत्या टप्प्यावर आहे? आणि भारतातील लोकशाही कोणत्या टप्प्यावर आहे? याचा विचार करता आपणास स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाहीची पायाभरणी करणाऱ्या पंडीत नेहरु यांच्या...

पाकिस्तानातील राजनैतिक संकट अधिक गहिरे

इमेज
            पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सुरु असणारे राजनैतिक संकट दिवसोंदिवस वेगवेगळे वळण घेत आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी पाकिस्तान मुस्लिम लिग कायदे गट(PML Q)च्या 10 आमदरांना निलंबित केल्यानंतर सदर मुद्दा पाकिस्ताताच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. तिथे होणाऱ्या सुनावणी दरम्यान सत्ताधिकारी पाकिस्तान डेमाँक्टिक अलायन्सकडून  अनेक चूकीच्या गोष्टी करण्यात आल्या.ज्या हा लेख लिहीत असताना देखिल करण्यात येत असल्याचे डाँनच्या बातमीत सांगण्यात येत आहे.      ःया  खटल्याचा सुनावणी करणाऱ्या 3 न्यायाधीशांवर पक्षपाती होण्याचा आरोप करत ट्टिटर या माध्यमातून त्यांना शिवी देणे तसेच  असभ्य भाषेत त्यांचा उल्लेख करणे त्यांनी आमच्या विरोधात निर्णय दिला तर आम्हला रस्त्यावर येवून लढा उभारा लागेल अस्या प्रकारची वक्तव्ये करणे आदी प्रकार सत्ताधिकारी पाकिस्तान डेमाँक्टिक अलायन्सकडून करण्यात येत आहे. या आघाडीत एकुण 17पक्ष आहेत. ज्यातील प्रमुख पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नुर गट आहे. सध्या पाकिस्तानात, पाकिस्तान मुस्लिम लीग नुर गटाचा पंतप्रधान आहे. पंतप्रधान...

विश्वविजेतापदाची रंजकता लयास

इमेज
कोणत्याही खेळाडूची आपण खेळत  असलेल्या खेळात विश्वविजेते होण्याचे स्वप्न असते . आपण खेळत असलेला खेळ ज्या व्यक्ती खेळतात त्या सर्वांना आपण हरवले याचा आनंदच काही और असतो . हा आनंद मिळवण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते खेळावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना देखील आपणास सर्ववोत्तम खेळ बघायला मिळावा अशी अपेक्षा असते . विश्वविजेता देखील अनेक चांगलया खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा अधिक चांगला खेळाचे प्रदर्शन करत त्यांच्यावर विजय मिळवत असल्याने खेळावर प्रेम करणाऱ्या खेळप्रेमींची ही अपेक्षा   एखादा खेळाडू विश्वविजेता होत असताना सहज पूर्ण होत असते . जगातील सर्व खेळामध्ये याच प्रक्रियेचा अवलंब करण्यात येतो . मात्र एका खेळासाठी मात्र किमान २०२२ या वर्षी तरी अपवाद करावा लागणार आहे . तो खेळ म्हणजे बुद्धिबळ   बुद्धिबळप्रेमींना या आनंदाला मुकावे लागण्याचे कारण गेल्या पाच वर्षांपासून विश्वविजेता असलेल्या मॅग्नस कार्लसन यांनी  यावर्षी  विशेवविजेते स्पर्धा ना खेळण्याचा घेतलेला निर्णय . गेल्या पाच वर्षांपासून विश्वविजेता असल्याने विश्वविजेता होण्याच्या प्रक्...

भारतात रंगणार ६४ घरांचा आखाडा

इमेज
         येत्या गुरुवार पासून अर्थात २८ जुलैपासून  आपल्या भारतात एक युद्ध बघायला मिळणार आहे या युद्धात आधुनिक शस्त्रात्रे वापरली जाणार नाहीत तर पारंपरिक  हत्ती उंट घोडा आणि एक वजीर  एका राजा तसेच पायी चालणाऱ्या सैनिकाचा यात वापर होणार आहे . महाभारतातील युद्ध १८ दिवस चालले  हे युद्ध पुढील १४ दिवस अर्थात १० ऑगस्टपर्यंत  चालणार आहे .या युद्धात जगभरातील १८८ देशांनी सहभाग नोंदवला आहे प्रत्येक देशाचे पाच  बुद्धिमान सैनिक हे युद्ध खेळणार आहे.  त्यांच्या मदतीला ६४ घरांच्या पटांगणात २ उंट २ घोडा २ हत्ती , एक वजीर आणि एका राजा आणि ८ साधे सैनिक असे साथींदार असतील  . या युद्धात सहभागी अस्नणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारे सैनिक यांच्या वापर करत प्रतिस्पर्ध्यावर मात करत या युद्धात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतील .   मी बोलत आहे चेन्नईपासून ५० किमी अंतरावर असलेल्या महाबलीपूरम येथे २८ जुलै ते १० ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या ४४ व्य बुद्धिबळ ऑलम्पियाडविषयी . या बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये गेल्या काही बुद्धिबळ ऑलम्पियाडचा वि...