पोस्ट्स

हेतू योग्य , कृती अयोग्य

इमेज
                      सध्या महाराष्ट्रातील शैक्षणिक वातावरण विविध वादांनी गाजतंय , ज्यात इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमाचा विषय प्रमुख आहे . अभ्यासक्रमात गणित विषयातील क्लिष्टता दुर व्हावी या उद्देशाने संख्या शिकवण्याची पद्धत याचा मुळाशी आहे . या बाबत एका वाक्यात सांगायचे झाल्यास , हेतू चांगला प्रामाणिक आहे, त्याबद्दल शंका घेण्यास वावच नाहीत, मात्र हे राबवण्याची पद्धत पुर्णतः.अयोग्य आहे                  शिक्षणाद्वारे  कमकुवत व्यक्तींचा क्षमता वाढवणे अपेक्षीत असताना, अस्तिवात असलेल्या क्षमतेला अनुसरुन अभ्यासक्रम राबवल्यास क्षमता अजून खालावेल मग त्या वेळेस दर्जा अजून खालवणार का ? हा प्रश्न आहे . क्षमता वाढवणे हाच एकमेव उपाय यावर आहे.                   आणि अश्या पध्द्तीने शिकलेले लोक आयष्यातील अडीअडचणींना तोंड देण्यास सक्षम होतील का ? मी एका ठिकाणी व्याख्यान ऐकलेले होते , त्यात त्यांनी सांगितले होते . आयुष्यातील अडचणींना घाबरायचे...

खेळांचा राजा बुद्धिबळ

इमेज
                                  आपल्याकडे आंब्याला फळांचा राजा , गुलाबाला फुलांचा राजा  म्हणून संबोधले जाते . त्याचा धर्तीवर खेळांचा राजा म्हणून कोणास संबोधायचे झाल्यास ती जागा घेण्यासाठी बुद्धिबळापेक्षा दुसरा दावेदार असूच शकत नाही , यात शंका नसावी . शारीरिक तंदरुस्तीबरोबर बुद्धीचे सामर्थ्य जोखणारा दुसरा खेळ असूच शकत नाही . काही जणांना आश्चर्याचे वाटेल, मात्र बुद्धिबळात शारीरिक क्षमता काशीकाय  जोखली जाते ? त्यांना मी सांगू  इच्छितो की  निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते हे तुम्हाला ज्ञात असेलच . जर तुमचा एखादा पाय अथवा एखादा हात जर जायबंदी असेल तर तुम्ही योग्य पध्द्तीने एखाद्या गोष्टीवर लक्ष देऊ शकणार नाही . आता शाररिक तंदुरुस्ती शिवाय आपण हातपाय जायबंदी होण्यापासून कसे काय रोखू शकू ? म्हणजेच एकाच वेळी शारीरिक आणि मानसिक कणखरपणा जोखणारा हा खेळ आहे .                  काही जण असे हि म्हणू शकतील की बाकीच्या सर्वच खेळात कमी अधिक प्रमाण...

माझे पहिले भाषणाची हकिकत भाग 2

इमेज
           वक्तृत्व ही एक कला आहे . याचा अनुभव मी नुकताच घेतला . त्या मागची पाश्वभुमी मी या आधीच सांगितली आहे . जर तूम्हाला त्याचे वाचन करायचे असल्यास लेखाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे .       जो सतत वाचतो , तो कालांतराने खुप छान लिहुही शकतो, मात्र माझ्या मते हा न्याय  वक्तृत्वास लावता येणे अशक्यप्राय आहे .जो सतत अन्य वक्त्यांचे वक्तृत्व ऐकतो ,तो छान बोलूच शकेल असे नाही . मीही अनेक भाषणे ऐकतो , म्हणून मी छान बोलू शकतो , असे म्हणणे धाडसाचे ठरेल .किमान माझा पहिला अनुभव तरी हेच सांगत आहे .      वक्तृत्व ही कला आहे, त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे असे माझे मत आहे . शब्दांची गती, तयार भाषणात समोरच्या रसिकांचा मुड बघून यथायोग्य बदल करणे . ते बदल  आहेत, हे श्रोत्यांच्या लक्षात न येवू देणे .             उपस्थित मान्यवरांचा यथोचित उल्लेख करणे . प्रासंगिक विनोदाला , आधीच्या  वक्त्याच्या संदर्भ आपल्या आधीच तयार केलेल्या भाषणात जोड...

सिहासनची चाळीशी

इमेज
               चित्रपट हे समाजावर फार मोठा प्रभाव टाकणारे माध्यम आहे .मात्र याचा विचार फारच थोडे सिने निर्माते  करतात , असे सर्वसाधारण चित्र आहे . जे निर्माते याचा विचार करतात , त्यांनी निर्माण केलेले चित्रपट कालातीत ठरतात . जसे जुने सिने निर्माते गुरुदत्त . आपल्या मराठीत हा मान  द्यायचा झाल्यास निसंकोच तो मान  जब्बार पटेल याना द्यावा लागेल . त्यांनी निर्माण केलेला सिहासन हा चित्रपट निर्मण होऊन आज चाळीस वर्षे होत आली , तरी साध्याचाच चित्रपट बघत आहोत , असे वाटते. इतकी त्याची कथासूत्र सरस आहे , आणि त्याची बांधणी सुद्धा सरसच आहे . याचा प्रत्यय आपणास पहिल्या क्षणापासून येतो .                       चित्रपटाचा पहिल्या फ्रेम मध्येच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचा लॉंग शॉट जवळ जवळ येते दिग्गु(निळू फुले ) या व्यक्तिरेखेवर स्थिरावतो . नंतर त्याचा प्रवास चित्रित करत चित्रपट सुरु होतो .एखाद्या सर्वोत्त्कृष्ट कथेला तितकीच साजेशी पटकथा कशी असावी , याचे यासारखे  उदाहरण खचित...

आसियान, सार्क आणि भारत

इमेज
            नुकतेच शांघाय कॉ ऑपेरेशन ऑर्गनायझेशन या संघटेनचे अधिवेशन झाले . माननीय पंतप्रधानांन नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या  दुसऱ्या  शपथविधीस   बिमस्टेक या प्रादेशिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते . त्यामुळे साध्ये युनाटेड नॅशनच्या ऐवजी प्रादेशिक सांधनांचे प्राबल्य वाढलेले दिसून येत आहे . त्यामुळे जगभरातील प्रादेशिक संघटना त्यातही भारतावर प्रभाव टाकणाऱ्या संघटनांची माहिती प्रत्येकाला असे आवश्यक आहे . त्याचाच खारीचा वाट उचलण्यासाठी आज मी तुम्हाला आसियान आणि सार्क संघटनेची ओळख करून देणार आहे .                                                                                   8आॉगस्ट हा आसियान  ऑगेस्ट  हा आसियान या प्रादेशिक संघटनेचा स्थापना दिवस . भारताचे परसदार अशा ज्या राष्ट्रांचा उल्लेख करता येइल अश्या...

कधी जागे होणार ?

इमेज
           काल शूक्रवारी नाशकात एका नाँन बँकिंग फायनांन्स  कंपनीत चोरीचा उद्देशाने बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या, ज्यामध्ये एकाचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर माध्यमे नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीवर बोलू लागली . माझ्या मते हे सर्व देशभरातील चित्र आहे . आतापर्यत ते अदृश्य स्वरूपात होते . नाशिकमध्ये ते दृश्य स्वरूपात दिसले, हाच तो काय फरक.                              गेले कित्येक दिवस नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात मरणासंपन्न शांतता आहे . नाशिकच्या तरूणाईला हाताला काम नाईये . गोंदे येथील औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने  बंद पडत आहेत . सातपूर येथील अनेक नामवंत  कंपन्या विविध कारणे दाखवत प्रक्षिणार्थी कामगाराना कामे देत नाहीये . त्यांना सुट्टी देत  आहे .  मात्र पापी पोटाला खायला तर लागतेच , त्या पोटाची खळगी भरण्यासाठी सरतेशेवटी तरुणाईला वाममार्गाचा अवलंब करावा लागतो , हे नक्कीच भुषणावह नाही .मुंबईतील टोळी य...

भारतीय माध्यमे आणि शांघाय कोऑपरेशन

इमेज
            सध्या किरिगिस्ता न या देशात " शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन' या जागतिक संघटनेचे अधिवेशन चालू आहे . आपल्या देशाचे पंतप्रधान मा . नरेंद्र  मोदी या अधिवेशनाला भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत . या जागतिक अधिवेशनात विविध जागतिक मुद्यांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये संघटनेच्या  सदस्य देशांमध्ये आर्थिक , व्यापारी सामाजिक, सांस्कृतिक , प्रादेशिक शांतता , शास्त्र विषयक  घडामोडी ,बदलते पर्यावरण  राजकीय घडामोडी   आदी घडामोंडीचा समावेश असणार आहे . त्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी हजर राहणार आहे . ज्यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सुद्धा असणार आहेत . कोणत्याही जागतिक अधिवेशनात काही द्विस्तरीय पातळीवर चर्चा होतच असतात . त्याच न्यायला अनुसरून भारताचे पंतप्रधान  नरेंद मोदी यांचा  काही राष्टांच्या प्रमुखांशी  चर्चा होणार आहेत . ज्यामध्ये प्रामुख्याने चीन या राष्टाशी आपले नरेंद्र मोदी चर्चा करत आहेत .             ...