पोस्ट्स

हिंदी मराठी दोघी भगिनी

इमेज
                            माझा गेले काही दिवस काही हिंदी भाषिक व्यक्तीशी सात्यत्याने संपर्क येतोय .त्यावेळी मला हिंदी आणि मराठीत काही साम्य स्थळे आणि काही वेगळ्या बाजू प्रकर्षाने जाणवल्या . त्या सांगण्यासाठी आजचा पञप्रसंग                                       हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा जर वरकरणी खुपश्या सारख्या वाटत असल्या तरी,  त्यात अनेक मूलभूत फरक आहे .   आपल्या मराठीतील "ज्ञ" या अक्षराचा हिंदीत उच्चार  " ग्य" अशा होतो .आपल्या मराठीत ज्ञ आणी ग्य ही दोन वेगळी अक्षरे समजली जातात . माञ हिंदीत ग्य आणी ज्ञ यांचे उच्चारण सारखेच आहे .   आपल्या मराठीत " ङ" हे अक्षर फारशे प्रचलीत नाही . माञ हिंदीत असे टिंब दिलेले अक्षर सर्वमान्य सहज गोष्ट आहे . मी जेव्हा हिंदीत काही लेखन केले तेव्हा माझ्या हिंदी भाषिक मिञांनी या मुद्याचा वापर करत चुका काढल्या असो . हिंदीत पुर्णविराम म्हणजे ...

जाने क्यू ?

इमेज
                  दिनांक ९ आणि १० जूनला ला मला माझे दोन जूने सध्या संपर्कात नसणारे मिञ भेटले होते त्यातील एकाशी माझा एकाशी चांगली मैञी होती.  तर एकाशी सर्वसाधरण मैञी  होती.  सर्वसाधरण मैञी असणाऱ्या  मिञाचा महाविदयालयीन अभ्यासात एक विषय कच्चा होता, तर दुसरा विषय माझा कच्चा होता.  एकमेकांचे कच्चे विषय माञ दुसऱ्याचे हुकुमी विषय होते . त्यामुळे अभ्यासात मदत करताना आमची मैञी झाली.  कांलातराने महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर आमचे भेटणे कमी होत होत बंद झाले,  आणि  जवळपास  4वर्षांनी तो मला भेटला.  दुसऱ्याची मेञी माञ सहज अश्या कोणत्याही कारणाविना झाली होती,  हा मिञ माझे महाविद्यालयीन शिक्षण संपून 5वर्षे झाले तरी  अजून चांगल्या संपर्कात आहे . जरी प्रत्यक्ष भेटणे होत नसले तरी व्हॉटसप फेसबुक, एस एम एस च्या माध्यमातून संपर्कात आहे तर हे दोन्ही मिञ मला अचानक भेटले.  दोन्ही वेळेस आम्ही हॉटेलमध्ये गेलो ज्या मिञासी अभ्यासातील काठिण्यामुळे मैञी झाली होती त्याच्याशी गप्पा फारशा रंग...

भुतकाळात डोकवतांना जून महिना

इमेज
    काही माणसे जन्माला येतानाच खुप चांगले नशिब घेवून येतात असे बोलले जाते. पण हे तेव्हढ्यापुरतेच मर्यादित नाही, ही गोष्ट काही महिन्याना पण लागू होते. माझा जन्म महिना अर्थात आँगस्ट आणि जून हे त्यातीलच काही महत्वाचे  महिने . जून महिन्यात आँपरेशन ब्ल्यू स्टार, सिक्किमचे विलीनीकरण,  भारताचा स्वातंञ्याचा कायदा व आणिबाणी या महत्वाचा घटना घडल्या. त्यातील आँपरेशन ब्ल्यू स्टार विषयी मी याचा आधीच बोललो आहे      भारताला ब्रिटिशांपासून ज्या कायदान्वये स्वातंञ्य मिळाले तो भारताचा स्वातंञ्याचा कायदा 3 जून 1947 ला ब्रिटिश संसदेत समंत झाला . त्या कायदान्वये भारतीय संस्थाने  स्वतंत्र झाली त्यांचावर भारतात किंवा पाकिस्तानात  सामील होण्याचे बंधन टाकण्यात आले नाही.  परिणामी काश्मीर स्वतंञ्य राहिले व ईतिहास आपणास माहिती आहेच .       भारतात कुटुंब नियोजन वगैरे कार्यक्रमाची सक्ती करणाऱ्या आणीबाणीचचे 2019 हे साल चव्वैचाळीसावे आहे . हा मानवी आयुष्याचा बाबतीत मोठा कालावधी आहे. त्या वेळेस या घटनेने वादळ निर्माण केले होते .लोकांचा मन...

ब्रेक्सिट एक अवलोकन भाग २

इमेज
                                          ब्रेक्सिट विषयावरील हा दुसरा लेख . पहिल्या भागात आपण ब्रेक्सिट या विषयाची पार्श्वभुमी आणि इतिहास बघितला . आज आपण त्याची सध्याची स्थिती बघणार आहोत . ज्यांना या विषयावरील माझा पहिला लेख वाचायचा असेल ते या दुसऱ्या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकचा वापर करून माझ्या पहिल्या लेखावर जाऊ शकतात . माझा या विषयावरील पहिला लेख १४ फेब्रुवारीला लिहला होता . त्यानंतर आज पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल आहे .                                   आजमितीस युनाटेड किंग्डमच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी  ब्रेक्सिट विषयावर संसदेमध्ये मिळालेल्या अपयशाची जवावाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे . सध्या त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत आहे . ब्रेक्सिट या विषयावर संसदेत अपयशी ठरलेल्या मे या दुसऱ्या पंतप्रधान .  त्यांचा आधी त्यांचाच पक्षाच्या डेव्हिड कॅमरेरून यांनी ब...

इसवी सन 1972 च्या पानावरून पुढे चालू

इमेज
                                   स्वातंञ्योत्तर भारताचा इतिहासात जे जे मोठे नैसर्गिक संकट आले त्यामध्ये 1972चा दुष्कळाचा समावेश करावाच लागेल . यावेळी लोकांना खायला अन्न न मिळाल्याने अनेक लोक निधन पावले . सध्या या दुष्कळाचा कहाण्या सांगितल्या जात आहेत .माञ त्यावेळेस लोकांना पिण्यासाठी पाणी होते , खायला अन्न नव्हते . तर आता खायला अन्न प्रचंड आहे पण पिण्यासाठी पाणी नाहीये . तसे बघायला गेले तर भारतात दर काही वर्षांनी मोठा दुष्काळ पडतोच . संत तुकाराम महाराज किंवा देव मामलेदार   महाराज यांच्या काळातील दुष्काळ प्रसिध्द आहेच . ब्रिटिश भारतात ( वसाहातवादी कालखंड )19व्या शतकाच्या अखेरच्या दोन शतकात भारतात प्रचंड दूष्काळ पडला होता . त्याचे ह्रुद्य द्रावक वर्णन इतिहासाची डाव्या नजरेतून मांडणी करणार्या जवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटी (जेएनयू) येथील प्रसिध्द इतिहाससंशोधिका रोमीला थापर यांच्या पुस्तकातून दिसते . याच काळात दुष्काळाच्या प्रश्नासाठी स्ट्रँची कमिशन नेमले गेले होते ज्याने अनेक उपयुक्त स...

खैरात संपली गुणवत्ता घटली

इमेज
                                 आज लागलेल्या शालान्त परीक्षेच्या  निकालाचे  वैशिष्ट्य म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षांपासून देण्यात येणारी गुणांची खैरात या वर्षी कमी देण्यात आली  . परिणामी  यावर्षी गेल्या  बारा वर्षातील उत्तीर्णांच्या निच्चांकांची नोंद  करण्यात आली . जे एका अर्थाने योग्यच झाले . गुणवत्तेच्या सुजवटीला त्यामुळे काही प्रमाणात . आळा बसला . अन्यथा ही सुजवटी जर काही काळ  अशीच सुरु राहिली   तर भविष्यात या गोष्टीचे अनेक अनिष्ट परिणाम दिसून आले असते  .       गुणवत्ता यादी बंद करून देखील दहावीच्या परीक्षेला आलेले अवास्तव मह्त्व आणि त्यातून येणाऱ्या ताणाला विद्यार्थाना सामोरे जाण्यासाठी काहीशी सोपी केलेली परीक्षा  पद्धती यामुळे  गेल्या काही वर्ष[पासून अनेक उत्तीर्णांची संख्या फुगलेली दिसत होती . एकीकडे "स्वयंम", " प्रथम सारख्या समाजसेवी संघटनांचे शालेय गुणवत्तेबाबत झोप उडवणारे अहव...

मराठी अनूवादित साहित्य आणि मी

इमेज
                             गेले काही दिवस मी स्वामी विवेकानंद यांच्या जिवनावरचे "अचेना अजाना विवेकानंद " नावाचे मुळचे बंगालीत असणारे माञ राजहंस प्रकाशनाने "अज्ञात विवेकानंद" नावाने मराठीत आणलेले पुस्तक वाचत आहे . मुळ पुस्तक बंगली साहित्यातले मानाचे समजले जाणारे आनंद आणी बंकिम पुरस्कार प्राप्त मणीशंकर मुख्योपाध्याय उर्फ शंकर यांनी लिहलयं प ुस्तक उत्तम आहे . ते जेव्हा वाचून संपेल तेव्हा पुस्तकाविषयी लिहीलच .मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते मराठीत येणाऱ्या  अनुवादीत पुस्तकांकडे अन्य भाषेतील खुप पुस्तके मराठीत अनुवादित होत आहेत माञ माझ्या अल्पशा अश्या अनुभवाचा नजरेतून बघीतले तर त्याचा तूलनेत खुपच कमी पुस्तके मराठीतून अन्य भाषेत भाषातरीत होतात .मराठीत सुध्दा प्रचंड स्वरुपात अत्यंत सकस साहीत्य निर्मीती होते माञ ही निर्मीती मराठीत्तेर भाषिकांना समजण्यासाठी आवश्यक असणारी ते साहित्य अन्य भाषेत अनुवादित होताना मला तरी आढळलेले नाही . माझे अनुभव विश अत्यंत तोकडे आहे याची मला पुर्ण जाणीव आहे .तरी जे काही अनुभव वि...