पोस्ट्स

भारताची जगाला साद

इमेज
      आपल्या मराठीतील माध्यमे एसटीच्या संपविषयी बातम्या देण्यात मग्न असताना , भारत जगातील स्वरावर विविध विषयावर जगाला साद घालत आहे ज्यामध्ये हवामान बदलविषयी ठोस कृतिकार्यक्र्म करण्याचा आवाहनाबरोबर  जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्टसंघ आदी अनेक संघटनेत बदल करून या संघटनांमध्ये अधिकाधिक देशांना सक्रिय सहभाग नोंदवण्याची संधी देणारे वातावरण निर्माण करण्याची गरज जगाला पटवून देत आहे . त्यासाठी एस सी ओ या नावाने प्रसिद्ध  शांघाय कॉपरेशन ऑरगेनझेशन या संस्थेच्या सरकार प्रमुखांच्या बैठकीचा वापर करत आहे . सध्या काझकिस्तान या देशातर्फे एस सी ओ च्या सरकार प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे कझाकिस्तानचे नूर सुलतान हे या बैठकीचे अध्यक्ष आहेत हा या बैठकीचे हे २०वे वर्ष आहे .कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने ऑनलाईन पद्धतीने ही बैठक होत आहे . भारतातर्फे या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर प्रतिनिधीत्व करत आहे याच वर्षी सप्टेंबर   महिन्यात एस सी ओची देशांच्या प्रमुखांची बैठक झाली होती ज्यामध्ये राष्ट्रपती आणि अध्यक्ष प्रामुख्याने ...

ब बुद्धिबळाचा (भाग १५ वा )

इमेज
                क्रिकेटच्या टी २० प्रकारातील विश्वविजेता ठरवण्याची स्पर्धा नुकतीच युनाटेड अरब अमिरात या देशात पार पडली या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनांतर पुन्हा एकदा हा देश दुसऱ्या एका खेळाच्या विश्वविजेता शोधण्यासाठीचा स्पर्धेचे आयोजनासाठी सज्ज झाला  आहे . ज्या खेळाच्या आयोजनासाठी हा देश सज्ज झाला तो खेळ आहे बुद्धिबळ . २४ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या दरम्यान दुबईत बुद्धिबळाच्या २०२० आणि २०२१ या दोन वर्षासाठी विश्वविजेता शोधण्यासाठी स्पर्धा होत आहे . २४ नोव्हेंबरला स्पर्धेचे उदघाटन होणार असून स्पर्धेचे सामने २५ नोव्हेंबर पासून सुरु होतील  मागच्या वर्षी २०२० ला  विश्वविजेत्याला आव्हान देण्यासाठी आव्हानवीर शोधण्यासाठी खेळवण्यात येणारी कॅन्डीडेट स्पर्धा झाली मात्र कोरोना संसर्गगमुळे विश्वविजेते स्पर्धा झाली नव्हती त्या वर्षाची स्पर्धा  आता दुबईत होत आहे . या स्पर्धेमध्ये अधिकृत समालोचक म्हणून फिडे या बुद्धिबळाच्या आंतराष्ट्रीय संघटनेकडून भारताच्या विश्वनाथन आंनद यांची नियुक्ती करण्यात आली आहे  ऑन नेपोम्नियाची      ...

साहित्य संमेलन!

इमेज
    डिसेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात नाशिकला ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होणार आहे त्यासाठी नाशिकला जोरदार तयारी सुरु आहे . नुकतेच हे संमेलन ज्या ठिकाणी होणार आहे ,त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील झाला . त्यावेळी या ठिकाणी कोण कोण विशेष मान्यवर उपस्थित रहाणार आहेत ?याची कार्यक्रम पत्रिका  देखील प्रसिद्ध करण्यात आली आणि काहिस्या शांत झालेल्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले .राजकीय विचारसरणीबाबत   काहीसे वादग्रस्त  मत प्रदर्शन करणाऱ्या एक व्यक्तीला आमंत्रण देण्यावरून एका जातीच्या संघटनेने प्रचंड विरोध केला आहे . त्यांचे मराठी साहित्यातील योगदान काय ? सदर व्यक्ती परभाषिक असून त्यांच्या कार्यक्रमांच्या वेळी सदर व्यक्ती कोणत्याच मराठी साहित्यिकाला बोलवत नाही तरी आपण का बोलवायचे ? असा युक्तिवाद त्यांना विरोध करण्यासाठी केला जात आहे .  माझ्या मते जे पूर्णतः अयोग्य आहे . साहित्यिकाला आमंत्रित करण्यासाठी भाषेचे बंधन असायला नको . कोणत्याही भाषेचा असला तरी साहित्यिकाला साहित्य संमेलनाचे दरवाजे बंद असायला नको . सध्या ते आपणस त्यांच्या...

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग3)

इमेज
      आतापर्यत एखाद्या बुद्धीबळपटुला यशस्वी होण्यासाठी आणि प्रशिक्षकाला यशस्वी खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभुत गुणांची प्राथमिक माहिती करुन घेतली. या  भागात आपण बुद्धीबळपटूस जिद्द चिकाटी आणि  स्मरणशक्ती हे गुण का आवश्यक आहे ,हे बघूया .                चिकाटी अथवा जिद्द हा गुण अनन्यसाधरण आहे. कोणत्याही खेळाडूस जिंकण्यासाठी या गुणांची आवश्यकता असते.पी  सि ए चँम्पियनशीपमध्ये  काँस्पराव विरुद्ध आनंद हे समोरासमोर विश्वविजेतेपदासाठी  एकमेकांच्या समोरसमोर उभे ठाकले असताना, शेवटच्याः डावात जो जिंकेल तो विश्वविजेता बनणार असी स्थिती उत्पन झाली. त्यावेळेस त्या सामन्यादरम्यान काँस्पाराव खेळी केल्यावर भिंतीवर बुक्के आणि दरवाज्याला लाथा मारत असे, शेवटी तो जिंकला. विश्वविजेते झाल्यावर आयोजीत पत्रकार परीषदेत पत्रकारांनी त्याचा आंतीम सामन्यातील वर्तणूकीविषयी विचारणा केल्यावर त्याने सांगितले,"मी माझ्यातील विजूगुषीवृत्ती दरवाज्यावर लाथा आणि भिंतीवर बुक्के मारुन जिवंत ठेवत होतो, विजूगुषीवृत्ती जिवंत ठेवल्यामुळे मी जिंक...

एसटी संपामुळे होरपळणारे दुर्लक्षित घटक

इमेज
          सध्या सुरु असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा  संप चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे ९०च्या दशकांत ज्याप्रमाणे मुबईतील गिरणी कामगारांचा संप गिरणीविश्व ज्या प्रमाणे उद्धवस्त करून गेला त्या प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा संप एसटीला पूर्णतः संपवून टाकेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे . माध्यमांमध्ये या संपविषयी ज्या बातम्या प्रसिद्ध करण्यात येत आहे, त्यामध्ये या संपामुळे प्रवाश्यांना होणारा त्रास,  एसटीचे बस बंद असल्यामुळे होणारे आर्थिक  नुकसान या विषयी भरभरून बोलले गेले , अजूनही बोलले जात आहे . मात्र या सर्व गदारोळात एक घटक मात्र काहीश्या दुर्लक्षिला गेला, ज्या घटकावर फारच थोडे बोलले गेले , तो घटक म्हणजे  बस स्थानकाच्या परिसरात  विक्री करणारे विक्रेते तसेच परिसरात असणाऱ्या हॉटेल लॉज चालकांचे होणारे नुकसान .        कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे आधीच लोकांचे पर्यटन  बंद झाले असताना , जे थोडेफार लोक बसचा वापर करत होते ते सुद्धा या संपामुळे एसटीपासून दुरावले . परिणामी आजमितीस या बस्थानकांच्या आसपासच्या परिसरात असणाऱ्य...

बुद्धिबळाचे मानसशास्त्र (भाग २ )

इमेज
            यशस्वी होणाऱ्या खेळाडूंमध्ये असाधारण गुणवत्ता असते. बुद्धिबळातील गुणवत्ता प्राप्त करताना असाधारण खेळाडू चटकन अथवा कमी वेळेत आणि सहजनतेने कौशल्य प्राप्त करतो . खेळाडू घडवताना प्रशिक्षकाने नकारात्मक विचार ठेवल्यास, खेळाडू घडवता येत नाही खेळाडूला नियमितपणे सकारत्मक विचारांशी जोडीनं घ्यावे लागते . येत नाही, जमत नाही, समजत नाही या गोष्टींना हद्दपार करावे लागते. कुठलाही खेळाडू सुरवातीलाच योग्य निर्यय घेऊ शकत नाही . टप्या टप्याने परिस्थितीचा ( Position) चा अभ्यास करवून घ्यावा लागतो .    या प्रक्रियेत मोठी  महत्वपूर्ण आणि महत्तपूर्ण जवाबदरी प्रशिक्षक पार पडतो . खेळाडू आणि पालकांशी नियमित संवाद साधने खेळाडूंच्या कमतरता शोधून त्यावर काम करणे , खेळाडूंची जिज्ञासावृत्ती वाढवणे त्यास नवनवीन ज्ञान उपलब्ध करून देणे ही जवाबदारी प्रशिक्षकाची असते. कोचेबीलिरी हा एक महत्त्वपूर्ण गुण खेळाडूंमध्ये असावयास हवा ,            योग्य तसेच जाणकार प्रक्षिक्षकाकडून खेळाडूने प्रक्षिशण घेतल्यास खेळाडू पुढे जाऊ शकतो . प्रक्षिशकावर व...

आभाळच फाटलंय !

इमेज
           आपल्या मराठीत एखाद्यावर प्रचंड प्रमाणात संख्येने अनेक संकटे आल्यावर त्याच्यावर आभाळ फाटलंय असे म्हणतात . आभाळ फाटलंय हा वाक्यप्रचार खरा असल्यासारखी स्थिती सध्या भारताच्या दक्षिणेच्या राज्यातील आहे तामिळनाडू पाँडिचेरी आणिआंध्र प्रदेशात प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे . आंध्र प्रदेशाच्या तिरुपती या धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या शहरात कधीही नव्हती अशी स्थिती निर्माण झाली आहे अत्यंत मुसळधार पाऊस आणि त्यात भरीस भर म्हणून होणारे लँडसाईड यामुळे तेथील प्रशासन आभाळ फाटलंय ही स्थिती अनुभवत आहे शनिवार २० नोव्हेंबर पर्यंत या पावसामुळे विविध घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर एक बस वाहून गेल्याने ५०जण बेपत्ता आहेत हवाई दल आणि राज्य आपत्ती मदत दलाच्या (state disaster relief force) तुकड्यांमार्फत मोठ्याप्रमाणात बचाव कार्य सुरु आहे हवाई दल मिग १७ या हेलिकॅप्टर चा मदतीने पुरात अडकलेल्या व्यक्तींची मदत करत आहे आंध्रप्रदेशच्या रायलसीमा या भागातील ३ आणि किनारी प्रदेशातील एका जिल्ह्याला या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या सेवांवर ...